महाभारताच्या १८ दिवसांच्या त्या युद्धानंतर एकही कौरव उरला नाही. उरला तो फक्त धृतराष्ट्र आणि गांधारी! तेव्हा गांधारीने श्री कृष्णाला श्राप दिला की "जसा माझा कुरुवंश संपला, तसा तुझाही यदुवंश संपून जाईल." त्या श्रापाला अवघी सृष्टी बळी पडली. श्री कृष्णाच्या जाण्याने द्वापरयुगही संपले.
द्वापर युगाचा अंत कसा झाला आणि कलियुगाची सुरुवात? (फोटो सौजन्य - Social Media)

१८ दिवसांचा अघोर पराक्रम संपला. गांधारीने श्री कृष्णाला श्राप दिला आणि त्या श्रापाचा पडसाद दिसू लागला.

युद्धाच्या ३ वर्षांनंतर यादव कुळातील सगळ्यांचा नाश होऊ लागला. यादव कुळ जवळ संपल्यात जमा होत होता.

श्री कृष्णाला सगळं ठाऊक होतं. त्याचं पृथ्वीवर येण्याचे कार्यही संपन्न झाले होते. श्रीकृष्ण एका झाडावर मौन अवस्थेत जाऊन बसतो.

तेव्हा जरा नावाचा शिकारी, कृष्णाच्या पायाला हरणीचा पाय समजून त्यावर बाण चालवतो. श्री कृष्ण सेंकदात शरीर त्यागून वैकुंठाकडे रवाना होतात.

त्याच क्षणी द्वापरयुगाचा अंत झाला आणि कलियुगाचा सुरुवात झाली.






