कोणत्याही देशात जायचे असेल तर व्हिसा आणि पासपोर्टशिवाय एंट्री दिली जात नाही. मात्र भारतीयांना जगभरातील अनेक देशांत व्हिसा फ्री एंट्री आहे, याचाच अर्थ काही देशांमध्ये भारतीय विना व्हिसा एंट्री करू शकतात. आम्ही तुम्हाला जगातील अशाच एका सुंदर देशाविषयी माहिती सांगत आहोत जिथे लोकांना फक्त 20 रुपयांत प्रवेश मिळतो. हे वीस रुपये इमिग्रेशनची पावतीसाठी आकारले जातात.
या देशात भारतीयांना केवळ 20 रुपयांत मिळतो प्रवेश; इथे ना व्हिसाची गरज ना पासपोर्टची...
आम्ही ज्या देशाविषयी बोलत आहोत तो देश म्हणजे म्यानमार. इथे तुम्ही इमिग्रेशन पावतीवर संपूर्ण देश फिरू शकता
भारत आणि म्यानमार या दोन देशांमधली सीमा सकाळी 6.30 ते संध्याकाळी 4.30 या वेळात चालत ओलांडायला खुली असते. या वेळेनंतर मात्र ही सीमा ओलांडता येत नाही
म्यानमारमधील काही लोकप्रिय स्थळांविषयी बोलणे केले तर श्वेडागॉन पॅगोडा, बागान मंदिरे, नगपाली बीच, इनले लेक, म्यानमारचे राष्ट्रीय संग्रहालय, फाउंग डाव ओ पॅगोडा अशी त्यांची नावे आहेत
मणिपूर राज्याची राजधानी इंफाळ या गावापासून रस्ते मार्गाने 3 तास प्रवास केला की 107 किलोमीटर अंतरावर मोरेह गाव लागते, जे भारतातले शेवटचे गाव आहे. हे गाव भारत-म्यानमारच्या सीमेवर वसलेले आहे
म्यानमारमध्ये तुम्ही अनेक मंदिरं, स्मारकं, समुद्रकिनारे, गुहा आणि पर्वतांचा आनंद लुटू शकता. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण भारतीय सीमेवरून इथे चालून जाता येते