भारतमध्ये प्रसिद्ध आहेत 'या' खास नवाबी बिर्याणी!
तामिळनाडूतील अंबूर शहरात कमीत कमी मसाल्यांचा वापर करून अंबर बिर्याणी तयार केली जाते. ही बिर्याणी तयार करता चिकन आधी शिजवले जाते. नंतर कोरड्या मसाल्यांचा वापर आणि आंबटपणा येण्यासाठी इतर मसाले वापरले जातात.
केरळमध्ये प्रसिद्ध असलेली बिर्याणी म्हणजे मलबारी बिर्याणी. काळी मिरी, नारळाचे दूध आणि तळलेले कांदे वापरून बिर्याणी बनवली जाते. त्यानंतर चिकन शिजवून भाताचा लेयर तयार करून बिर्याणी बनवली जाते.
कोलकत्यामध्ये बनवली जाणारी बिर्याणी जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहे. उकडलेले बटाटे, चिकन आणि थोडा गोड चवीचा भात वापरून कोलकत्ता बिर्याणी तयार केली जाते. याशिवाय ही बिर्याणी बनवताना केवड्याच्या पाण्याचा वापर प्रामुख्याने केला जातो.
नवाबांच्या लखनौ शहरात अवधी बिर्याणी प्रसिद्ध आहे. ही बिर्याणी बासमती तांदूळ आणि चिकन शिजवून तयार केली जाते. याशिवाय चिकन शिजल्यानंतर भाताचे लेयर करून बिर्याणी पुन्हा एकदा शिजवली जाते.
हैदराबादमध्ये बनवलेली जाणारी हैदराबादी बिर्याणी जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहे. मुघलाई आणि तेलंगणा शैलीचा अनोखा मिलाफ पाहायला मिळतो. ही बिर्याणी तयार झाल्यानंतर तिला काहीवेळा कोळश्याचा वापर करून दम दिला जातो. यामुळे या बिर्याणीला स्मोकी टेस्ट येते.