Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारकडून दिलासा योजनांची घोषणा

मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमारांच्या वीजदरात सवलत देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्णय घेत, मच्छीमार वर्गालाही दिलासा दिला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 24, 2025 | 05:33 PM
Devendra Fadanvis News

Devendra Fadanvis News

Follow Us
Close
Follow Us:
  • अतिवृष्टीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
  • पंतप्रधान आवास योजनेतून नवे घर मिळणार
  • पावसामुळे ढासळलेल्या विहिरींसाठी देखील विशेष मदत

Maharashtra Politics: महाराष्ट्रात यंदाच्या पावसाने मोठा तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागांतील उभी पिके आडवी झाली, तर काही ठिकाणी पावसाच्या तडाख्यामुळे शेतातील मातीही वाहून गेली. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी दिलासा योजनांची मोठी घोषणा करण्यात आली आहे. सरकार आधीच ‘लाडकी बहीण’ योजना, तसेच महिलांना एसटी बस प्रवासात अर्ध्या तिकिटाची सुविधा अशा विविध सामाजिक योजनांद्वारे नागरिकांना मदत करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.

Tulsi Vivah: 1 की 2 नोव्हेंबर कधी आहे तुळशी विवाह, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. ज्यांच्या घरांचे पावसामुळे नुकसान झाले आहे, त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून नवे घर मिळणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली आहे, त्यांना स्वतंत्र आर्थिक मदत दिली जाईल. पावसामुळे ढासळलेल्या विहिरींसाठी देखील विशेष मदत देण्याची घोषणा शासनाने केली आहे.

दरम्यान, सरकारकडून ‘लाडकी बहीण’ योजना आणि महिलांसाठी एसटी बसमध्ये अर्ध्या तिकिटाची सुविधा यांसारख्या सामाजिक योजना आधीच राबविण्यात येत आहेत. त्यासोबतच कृषी क्षेत्रालाही स्थैर्य देण्यासाठी सरकारने हा दिलासा पॅकेज पुढे आणल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मस्त्य व्यवसायाला कृषी दर्जा; मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

राज्य सरकारने मस्त्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्याने आता मच्छीमार, मस्त्य संवर्धक, मस्त्य व्यवसायिक तसेच मस्त्य कास्तकार यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध होणार आहे. तसेच मस्त्य व्यवसाय प्रकल्पांनाही कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत लागू होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

मेडिकल क्षेत्रात करिअर घडवायचे आहे? पण कसे करावे? Idea नाही; नक्की वाचा

मात्र या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाची एनएफडीबी (National Fisheries Development Board) अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे. या नव्या निर्णयामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना सवलतीच्या दरात वीज पुरवली जात असून, सौर कृषीपंपांवर देखील मोठं अनुदान दिलं जात आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच आता मच्छीमारांनाही सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमारांच्या वीजदरात सवलत देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्णय घेत, मच्छीमार वर्गालाही दिलासा दिला आहे.

या निर्णयामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमारांना मोठा फायदा होणार असून, त्यांच्या उत्पादन खर्चात लक्षणीय घट होईल, असा सरकारचा विश्वास आहे.

 

Web Title: Big news for farmers affected by heavy rains state government announces relief schemes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 05:33 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

शनिवारवाड्यातील नमाज पठाणावरुन पुण्यातील राजकारण तापलं; अनेक नेते आमनेसामने
1

शनिवारवाड्यातील नमाज पठाणावरुन पुण्यातील राजकारण तापलं; अनेक नेते आमनेसामने

‘…तर मला पक्षातून काढा’; रविंद्र धंगेकरांचं थेट उपमुख्यमंत्री शिंदेंनाच आव्हान
2

‘…तर मला पक्षातून काढा’; रविंद्र धंगेकरांचं थेट उपमुख्यमंत्री शिंदेंनाच आव्हान

Devendra Fadnavis: ‘दिल्ली अजून दूर आहे, २०२९ पर्यंत मीच…’; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा; तर महायुतीत…
3

Devendra Fadnavis: ‘दिल्ली अजून दूर आहे, २०२९ पर्यंत मीच…’; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा; तर महायुतीत…

BMC Election: BJP सर्वत्र युती करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत
4

BMC Election: BJP सर्वत्र युती करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.