
सोलापुरात भाजपचा दणदणीत विजय
विरोधकांचा सुपडा साफ- जयकुमार गोरे
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपला मोठे यश
सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेत आज भाजपचा अध्यक्ष विराजमान झाला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपला मोठे यश प्राप्त झाले आहे. त्यावर आता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भाष्य केले आहे. मला आज मनापासून आनंद झाला असून, मी भाजप पक्षाच्या आमच्या नेतृत्वाचे आभार मानतो असे जयकुमार गोरे म्हणाले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या विजयवार बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ” एका शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या मुलाला आज जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली गेली आहे. ही केवळ भाजपमध्येच होऊ शकते. त्यामुळे मी त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्षांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच एका शेतमजुराच्या, शेतकऱ्याच्या मुलाला आणि निष्ठावंत कार्यकर्ता असलेल्या कार्यकर्ता इंद्रजीत पवार यांना उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली, याचा मला मनापासून आनंद आहे.”
“प्रत्येक कुटुंबाला घर मिळावे हा पंतप्रधान मोदींचा…”; काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे?
जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर देखील टीका केली आहे. ते म्हणाले, “निवडणुकीचा निकाल हेच विरोधकांना उत्तर आहे. मला वेगळं उत्तर द्यायची आवश्यकता वाटत नाही. या निकालातून कोणाचा सुपडा साफ झाला आहे, हे दिसून येत आहे. भाजपला नगरपालिका, महापालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचंड यश मिळालं आहे. आज या सर्व संस्था भाजपच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. त्यामुळे आमच्यावर मोठी जबाबदारी आहे. लोकांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून ताकदीने लोकांची सेवा करणे ही आमची जबाबदारी आहे.”
Solpaur News : युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम; एलपीजी पुरवठ्यावर ताण, प्रशासन सतर्क
पुढे बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, “ध्यक्षपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो. या कालावधीत किती जणांना संधी द्यायची, हा पक्षांतर्गत विषय आहे आणि पक्ष त्याबाबत निर्णय घेईल. आम्हाला पुढील पाच वर्षांत प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात २१ कोटींची कामं करायची आहेत. आम्हाला कायम आव्हान स्वीकारून काम करायला आवडतं. त्यामुळे हे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं, तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री महोदय त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.तिवृष्टीमुळे ज्यांचं नुकसान झालं, त्यांना ८०-९०% नुकसानभरपाई मिळाली आहे. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका असेल. अधिवेशन सुरू असताना समाधान अवताडे यांच्यावर तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी आहे, त्यामुळे ते तिथे उपस्थित आहेत. आम्ही सर्व एकत्र आहोत, म्हणूनच आज हे विजयाचे निकाल पाहायला मिळत आहेत.”