
१४ जिल्ह्यांत ४७ जागांवर पोटनिवडणूक जाहीर
मुंबई : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी राज्यातील विविध नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांमध्ये अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषद येथील संपूर्ण निवडणुकीसह अनेक ठिकाणच्या पोटनिवडणुकांचा समावेश आहे.
पातूर नगरपरिषदेत अध्यक्षपदासह २० सदस्य पदांसाठी निवडणूक होणार आहे. तसेच उमेदवारांच्या निधनामुळे स्थगित झालेल्या मनमाड, पिंपळनेर, गेवराई आणि अकोट येथील प्रत्येकी एका प्रभागासाठीही मतदान होणार आहे. याशिवाय ११ जिल्ह्यांतील १४ नगरपंचायतींमधील १५ रिक्त जागा आणि ३ नगरपरिषदांमधील ३ जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. एकूण १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा आणि १४ नगरपंचायतींमधील ४७ रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
या निवडणुकांमुळे संबंधित भागांतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, निवडणूक कार्यक्रम १२ मे ला जाहीर केला जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १८ ते २५ मे ही तारीख निश्चित केली गेली आहे. तर अर्ज छाननी २६ मे रोजी केली जाणार आहे.
अर्ज मागे घेण्याची मुदत…
अर्ज मागे घेण्याची मुदत २७ मे ते २ जून ही असणार आहे. यासाठी मतदान हे २० जून (सकाळी ७.३० ते सायं. ५.३०) या वेळेत घेतले जाणार आहे. दरम्यान, मतमोजणी आणि निकाल २१ जून
असून, स्थानिक पातळीवर तयारीला वेग आला आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी
दुसरीकडे, नोव्हेंबर 2024 मध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे नवे सरकार स्थापन झाले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आला. या घटनेला आता दीड वर्षे उलटली आहेत. मात्र, सत्तेतून बाहेर पडलेल्या नेत्यांच्या नाराजीची ‘धुसफूस’ अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, या काळात राजकीय विजनवासात गेलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार नुकतेच मुंबईत दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.