Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News: Devendra Fadnavis यांची साताऱ्यात मोठी घोषणा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे. आज सातारा येथील प्रधानमंत्री आवास योजना कार्यक्रमात बोलताना त्यांनी हि मोठी घोषणा केली

  • By विवेक
Updated On: May 15, 2026 | 03:41 PM
देवेंद्र फडणवीस यांची साताऱ्यात मोठी घोषणा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

देवेंद्र फडणवीस यांची साताऱ्यात मोठी घोषणा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Follow Us
Follow Us:
  • कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा
  • ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी
  • कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर, सरकारला दिला इशारा
राज्यात कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. आखाती देशांतील युद्ध आणि निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कांद्याचा खर्चहि निघत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. यावरून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला असून राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून आंदोलन केले. यावरूनच आता वातावरण आणखी गरम होण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे. आज सातारा येथील प्रधानमंत्री आवास योजना कार्यक्रमात बोलताना त्यांनी हि मोठी घोषणा केली यावेळी ते म्हणाले, “कांद्याचा शेतकरी अडचणीत आहे. अनेक शेतकरी कांद्याला एक रुपया भाव मिळतोय म्हणून रस्त्यावर फेकून द्यायला निघाले आहेत. म्हणून मी शिवराज चौहान यांना हा कांदा विकत घ्यायची विनंती केली. त्यानुसार, आजपासून महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून १२ रुपये ३५ पैसे प्रतिकिलो दराने कांदा विकत घ्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.,” अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

यावेळी सभेला संबोधित करताना ते पुढे म्हणाले, “येत्या आठवड्यात आपण साखर कारखानदारीबाबतची एक बैठक घेणार आहोत ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरलं, त्यांना प्रोत्साहनपर राशी दिल्या जातील,” अशी घोषणा त्यांनी केली.

Purvesh Sarnaik : “राऊत मंद झाले…, संजय राऊत यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा…”, पूर्वेश सरनाईकांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान हे सातारा येथे ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ व ‘महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ’ येथे उपस्थित होते. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले हे उपस्थित होते.

कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर, सरकारला दिला इशारा

“कांद्याचे भाव घसरले, शेतकऱ्यांचे संसार मोडले!” अशा संतप्त घोषणा देत आज पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आक्रमक ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. भररस्त्यात कांदा ओतून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी इशारा दिला की, मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र संघर्ष छेडला जाईल.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या

कांद्याला तातडीने रास्त हमीभाव लागू करा.

प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा.

निर्यात धोरण स्थिर ठेवा आणि जाचक अटी रद्द करा.

प्रत्येक तालुक्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करून साठवणूक क्षमता वाढवा.

“गडकरी मुख्यमंत्री असते तर…” प्रणिती शिंदे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा

Web Title: Cm devendra fadnavis big desicion over onion farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Onion Farmer

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण
1

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश
2

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ
3

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
4

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.