Praniti Shinde prizes Nitin Gadkari
नितीन गडकरी यांनी सोलापूर दौऱ्यात २७८४ कोटींच्या ५ राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचे भूमिपूजन केले. यावेळी कार्यक्रमाला काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे, खासदार ज्योती वाघमारे, कर्नाटक राज्य धोरण आयोग अध्यक्ष बी आर पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजय देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, आमदार कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे हे उपस्थित होते.
यावेळी सभेला संबोधित करताना प्रणिती शिंदे यांनी गडकरींच्या कामाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “सर्व खासदारांसाठी कायम ज्यांचा दरवाजा उघडा असतो ते नेते म्हणजे नितीन गडकरी. त्यांच्याकडे पक्षीय भेद नसतो. तुमच्यासारख्या नेत्याची महाराष्ट्राला उणीव आहे. आज जर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता,” असे मोठे विधान त्यांनी यावेळी केले.
त्या पुढे म्हणाल्या, “आपण हा कार्यक्रम घेतला आणि त्यासाठी मला निमंत्रण पाठवले. आजच्या परिस्थितीत जिथे विरोधकांना शत्रू मानले जाते तिथे तुम्ही विरोधकांना सन्मानाची वागणूक देता आणि आमची कामे मार्गे लावता. हे आमच्यासाठी नवल आहे आणि त्यासाठी तुमचे आभार मानते. तुम्ही मी दिलेल्या पत्रावरती रिमार्क करून कामाला मंजुरी दिली. त्यावेळेस मला असे वाटले कि तुमच्यासारख्या नेत्याची महाराष्ट्राला उणीव आहे. तुम्ही जर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राची परंपरा आणखी बळकट असती. आम्हाला आणखी बळ मिळाले असते. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र राहिला असता. महाराष्ट्राच्या विकासाला आणखी बळ मिळाले असते. पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आणखी पुढे गेला असता,” असे त्या यावेळी म्हणाल्या.
यावेळी सभेला संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले, “विकासाचा असमतोल निर्माण झाला आहे. त्यासाठी स्मार्ट व्हिलेजसाठी प्रयत्न करत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसाठी रस्ता झाला याचा आनंद आहे. मात्र याच श्रेय माझं एकट्याच नाही. असंख्य इंजिनिअर आणि कंत्राटदार माझ्यासोबत काम करत आहेत. मी केवळ निमित्तमात्र आहे. आम्ही २०० हजार कोटी खर्च करून बौद्ध सर्किट पूर्ण केले, असे यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवाडांच्या आरोपांमुळे खळबळ






