Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंधी समाजातील लोकांना देखील सोडवा लागणार का भारत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशातील पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांमध्ये देश सोडण्यास सांगितले होते. याबाबत आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 28, 2025 | 02:39 PM
'विधानसभेला हे शोभणारं नाही, कारवाई झालीच पाहिजे'; विधानभवनातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

'विधानसभेला हे शोभणारं नाही, कारवाई झालीच पाहिजे'; विधानभवनातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पहलगाममध्ये पर्यटकांवर लक्ष्य करुन त्यांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यानंतर देशातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी 48 तासांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपली असून यावरुन मात्र महायुतीच्या नेत्यांमध्ये एकमत नसल्याचे दिसून आले आहे. 107 पाकिस्तानी बेपत्ता असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तर एकही नागरिक बेपत्ता नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एकवाक्यता नसल्याचे म्हणत विरोधकांनी टीकेची झोड उठवली. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “बऱ्याच नेत्यांना वेगवेगळी अधिकारी माहिती देत असतात. त्यानुसार नेते वक्तव्य करुन मते मांडत असतात. केंद्र सरकारच्या आदेशानंतर ज्या पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडायला हवा अशा नागरिकांची आम्ही यादी तयार केली आहे. त्यानुसार लोकांची ओळख पटवण्यात आली आहे. कोणतीही व्यक्ती त्यातून सुटलेली नाही. यादीमध्ये असलेल्या सर्वांना बाहेर पाठवले जाणार आहे,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “केंद्र सरकारने आदेश दिल्यानंतर आम्ही राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना शोधण्यास सुरुवात केली. त्यांच्यापर्यंत केंद्र सरकारचा निरोप पोहचवून त्यांना देश सोडण्यास सांगितले. राज्यातील पोलीस हे यादीतील सर्व लोक बाहेर जात आहेत की नाहीत यावर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या हालचाली ट्रॅक करत आहोत. याबाबत अंतिम आकडेवारी समोर आली की जाहीर केली जाईल. बऱ्याच वेळा आकडेवारीमुळे गोंधळ होत असतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अंतिम आकडेवारी देऊ. सर्व पाकिस्तानी लोकांना राज्याबाहेर आणि देशाबाहेर काढल्यानंतर त्याची आकडेवारी देखील आम्ही जाहीर करु,” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

देवेंद्र फडणवीस यांनी सिंधी समाजाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, “सिंधी समाजातील हिंदू धर्मीय लोकांना परत जावं लागणार नाही. अनेक सिंधी लोक लाँग टर्म व्हिसा घेऊन महाराष्ट्रात आले आहेत. त्यांनी भारतीय नागरिकत्व मिळावं यासाठी अर्ज केले आहेत. त्यांनी भारत सोडण्याचं काहीच कारण नाही. केवळ मर्यादित कालावधीचा व्हिसा घेऊन भारतात आलेल्या नागरिकांना ४८ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. याबाबतची राज्य सरकारने आपली जबाबदारी पार पाडली आहे. उर्वरित काम काही वेळात पूर्ण होईल. अनेक पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात होते, त्यांची ओळख पटवून त्यांना माघारी पाठवले आहे.” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Web Title: Cm devendra fadnavis live gave information about pakistani citizens in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Jammu Kashmir Terror Attack
  • Pahalgam Terrorist Attack

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?
2

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
3

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis News: दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन
4

Devendra Fadnavis News: दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.