
Congress leader H,narshvardhan Sakpal slams Maharashtra Government over petrol diesel shortage, petrol diesel shortage, H,narshvardhan Sakpal slams Maharashtra Government
“इंधनाबाबत सरकारचे नियोजन पूर्णपणे ढिसाळ ठरले आहे,” असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे. पेट्रोल डिझेल तुटवडयावरून तसेच गेल्या आठ दिवसात तीनवेळा झालेल्या इंधन दरवाढीवरून आता नागरिक चांगलेच संतप्त झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांमध्ये इंधन तुटवड्यावरून तणावाचे वातावरण असून शेतकरीवर्गातदेखील इंधन तुटवड्यावरून चिंता व्यक्त केली जात आहे. पेरणीपूर्वीच ट्रॅक्टरमध्ये टाकण्यासाठी इंधन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. ग्रामीण भागात विशेष करून परभणी, हिंगोली, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांनी पेट्रोल डिझेल भरण्याकरता पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे.
डिझेल-पेट्रोलसाठी जनतेमध्येच हाणामारी सुरू असल्याची चित्रे आज सर्रास मराठवाडा आणि विदर्भात पाहायला मिळत आहेत. इंधनाबाबत सरकारचे नियोजन पूर्णपणे ढिसाळ आणि कृतिशून्य ठरले असून सामान्य नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिस्थिती हाताळण्यात सरकार सपशेल अपयशी ठरत असून… pic.twitter.com/ET1VLhuGpt — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) May 24, 2026
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हर्षवर्धन सकपाळ यांनी सरकारवर ताशेरे ओढले. ते यावेळी म्हणाले, “डिझेल-पेट्रोलसाठी जनतेमध्येच हाणामारी सुरू असल्याची चित्रे आज सर्रास मराठवाडा आणि विदर्भात पाहायला मिळत आहेत. इंधनाबाबत सरकारचे नियोजन पूर्णपणे ढिसाळ आणि कृतिशून्य ठरले असून सामान्य नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिस्थिती हाताळण्यात सरकार सपशेल अपयशी ठरत असून तातडीने नियंत्रण न मिळवल्यास हे प्रकार आणखी गंभीर होण्याची भीती आहे,” असे ते म्हणाले.
“१०-१५ तास लाईनमध्ये थांबूनही शेतकऱ्यांना…” इंधन तुटवड्यावरून रोहीत पवार यांचा सरकारवर निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे पाऊल उचलत पेट्रोल डिझेल टंचाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज (शनिवार, २२ मे) शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते यावेळी म्हणाले, “शेतकऱ्यांना जे काही डिझेल लागेल ते ते उपलब्ध करवून द्या असे आदेश मी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी साठेबाजी करत असेल तर त्यांच्यावर लक्ष ठेवा. कारण काही भागात डिझेलची मागणी २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. अश्याप्रकारे डिझेलची मागणी अचानक वाढत असेल तर काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे. शेतकऱयांना त्रास होऊ नये यासाठी मी उपाययोजना करायला सांगितले आहे. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बुक बघून त्यांना डिझेल देणे सुरु केले आहे,” असे ते यावेळी म्हणाले.