Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुख्यमंत्र्यांनी वजन काय असेल ते टाकलं पाहिजे, वेळप्रसंगी पंतप्रधान मोदींकडे…’; काँग्रेस नेते थोरात यांचं विधान

बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, 'पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पिके वाहून गेली आहेत. पशूंचे नुकसान झाले असून, नागरिक आणि शेतकरी अडचणीत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 27, 2025 | 01:11 PM
धाराशिव जिल्हा खूप अडचणीत तरीही प्रशासनामध्ये गांभीर्य नाही; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची टीका

धाराशिव जिल्हा खूप अडचणीत तरीही प्रशासनामध्ये गांभीर्य नाही; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची टीका

Follow Us
Close
Follow Us:

धाराशिव : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक नेतेमंडळींकडून नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा सुरु आहे. असे असताना आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला. यावेळी त्यांनी सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पिके वाहून गेली आहेत. पशूंचे नुकसान झाले असून, नागरिक आणि शेतकरी अडचणीत आहेत. सध्याचा कठीण कालखंड महाराष्ट्रासाठी आहे. सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा आहे’. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावर थोरात म्हणाले, ‘केंद्र सरकारची मदत त्यांनी घ्यावी. अत्यंत भरून मदत मिळायला हवी. महाराष्ट्र सर्वात जास्त GST उत्पन्न देतो. मात्र, त्याचा परतावा नाही. मुख्यमंत्र्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि पंतप्रधानांनी मदत करायला हवी’, असे ते म्हणाले.

हेदेखील वाचा : Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू; कशी आहे महायुतीची रणनीती?

तसेच आमच्या सर्वांचे डोळे या मदतीकडे लागले असून, लवकरात लवकर मदत करायला हवी. पंचनामा हा विषय राहिलेला नाही, विषय सरसकटचा आहे. देवेंद्र फडणवीस यांचे वजन आहे की नाही हे मदत येण्यावर अवलंबून आहे. वजन काय असेल ते टाकलं पाहिजे. वेळप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे हट्ट करायला हवा. राज्य सरकारकडून पैशांना कमी पडणार नाही हे पूर्वीपासून त्यांचे वाक्य आहे. याआधी ते खूप वेळा बोलले आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांची इच्छा दाखवायला हवी, असेही थोरात यांनी सांगितले.

धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्सवर थोरात म्हणाले…

धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण यांचा डान्सचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावरही थोरात यांनी समाचार घेतला. धाराशिव जिल्हा खूप अडचणीत आहे. येथील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावेळी मुख्य भूमिका ही जिल्हाधिकाऱ्यांची आहे. मात्र, प्रशासनामध्ये गांभीर्य नाही. गांभीर्य तेव्हाच येते जेव्हा सरकारमध्ये गांभीर्य असेल, सरकारमध्येचं गांभीर्य दिसत नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारलाही टोला लगावला.

Web Title: Expecting substantial assistance from the government for the affected areas demand of balasaheb thorat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 01:11 PM

Topics:  

  • Balasaheb Thorat
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांपासून, बाईक रॅली, मिरवणुकांपर्यंत…; बचतीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
1

Maharashtra Politics: मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांपासून, बाईक रॅली, मिरवणुकांपर्यंत…; बचतीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra MLC Oath Ceremony: निलम गोऱ्हे, बच्चू कडूंसह १० जणांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ
2

Maharashtra MLC Oath Ceremony: निलम गोऱ्हे, बच्चू कडूंसह १० जणांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

Anupam Kher : ‘जिथे राजने सिमरनचा हात धरला…’ त्या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचले अनुपम खेर; महाराष्ट्र सरकारकडे केली खास मागणी
3

Anupam Kher : ‘जिथे राजने सिमरनचा हात धरला…’ त्या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचले अनुपम खेर; महाराष्ट्र सरकारकडे केली खास मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.