
Devendra Fadnavis: सुनेत्रा पवारांवरील 'गुंगी गुडिया' टीकेवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात (Photo Credit- AI)
पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेस पक्ष राजकीयदृष्ट्या पूर्णपणे हतबल झाला आहे. “हे लोक अत्यंत खालच्या स्तरावर गेले आहेत. त्यांना जनतेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, कोणी त्यांना विचारत नाही. त्यामुळे केवळ चर्चेत राहण्यासाठी आणि बातम्यांमध्ये येण्यासाठी अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
इतक्या खालच्या थराला जाणारे राजकारण पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. इतने निम्न स्तर तक गिरने वाली राजनीति पहली बार देखने को मिल रही है। ( मुंबई | 04-08-2026)#Maharashtra #Mumbai pic.twitter.com/D5Zjzlhwbk — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 4, 2026
पुढे बोलताना त्यांनी “बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ” या म्हणीचा उल्लेख करत काँग्रेसच्या रणनीतीवर टीका केली. “सध्या त्यांची राजकीय भूमिका केवळ वादात राहण्यापुरतीच उरली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेत इतक्या खालच्या पातळीवरील भाषा यापूर्वी क्वचितच पाहायला मिळाली आहे,” असेही ते म्हणाले.
सुनेत्रा पवार यांच्यावरील या टिप्पणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सह महायुतीतील सर्वच घटकपक्ष आक्रमक झाले आहेत. काँग्रेसच्या या वक्तव्याविरोधात राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. या प्रकरणामुळे येत्या दिवसांत सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
माध्यमांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात असलेल्या नेत्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणे अपेक्षित असते. त्यांनी बीडमधील पत्रकार परिषदेत घडलेल्या घटनेचा उल्लेख करत, एका नेत्याने पत्रकारांना गप्प बसण्यास सांगितले, मात्र त्या वेळी सुनेत्रा पवार यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही,” असा आरोप केला. त्यांच्या मते, त्या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने वापरलेला “गुंगी गुडिया” हा शब्दप्रयोग करण्यात आला असून तो वैयक्तिक टीका नसून त्यांच्या भूमिकेचे वर्णन असल्याचा दावा त्यांनी केला. सपकाळ यांनी पुढे म्हटले की, “सुनेत्रा पवार विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर मौन बाळगतात. अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातील प्रकरण, अर्थ खात्याचा मुद्दा तसेच इतर राजकीय घडामोडींवर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली दिसत नाही. संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा विषयांवर स्पष्ट भूमिका मांडणे अपेक्षित असते.”