
Hemlata Patil upset for not giving Municipality group leader post even after ajit pawar promise
नुकत्याच महापालिका निवडणूका झाल्या होत्या. अद्याप अनेक पालिकांमध्ये महापौर ठरवण्यात आलेला नाही. त्यापूर्वीच अजित पवारांचे निधन झाल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे. मात्र अजित पवारांच्या मृत्यूनंतर हेमलता पाटील यांनी त्यांच्यासोबत राजकारण केले जात असल्याचा आरोप केला आहे. “अजित दादांच्या अस्थी विसर्जित होण्यापूर्वीच काहींनी गलीच्छ राजकारण सुरू केलं आहे. सुनील तटकरे यांच्या नावाने कोणी बनावट पत्र, बनावट सही, शिक्के मारून पत्र दिलं का? असा प्रश्न हेमलता पाटील यांनी उपस्थित केला आहे.
हे देखील वाचा : मोठा अनर्थ टळला! मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणाच्या काही क्षण आधीच…
काय म्हणाल्या हेमलता पाटील?
हेमलता पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, “ अजित दादांनी मला शब्द दिलेला असताना, सीमा ठाकरे गटनेत्या कशा झाल्या? प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याप्रकरणी खुलासा करावे आणि मला पुढील आदेश द्यावे. अजित दादांच्या मृत्यू नंतर काही लोक जर एवढं खालच राजकारणं करत असतील तर मला काहीच नको” अशा शब्दांत हेमलता पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त करत भूमिका मांडली आहे.
हेमलता पाटील या मूळच्या काँग्रेसच्या आहेत. विधानसभा निवडणूक निकालानंतर त्यांनी काँग्रेस प्रदेश प्रवक्तेपदाचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, दीड-दोन महिन्यात त्यांनी शिंदे गट सोडला. त्यानंतर हेमलता पाटील यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या 30 ते 35 वर्ष काँग्रेसमध्ये होत्या. त्यांच्याकडे 6 टर्म नगरसेवक पद भूषवण्याचा अनुभव आहे. यंदाची त्यांची सातवी टर्म होती. त्यांना दिवंगत नेते अजित पवारांनी गटनेते बनवण्याचा शब्द दिला असल्याचा दावा हेमलता पाटील यांनी केला आहे.
हे देखील वाचा : दादांच्या अपघातामागे संशयाचा धूर; लिंबू-मिरची उताराः ब्लॅक बॉक्सपर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरितच
अजित पवार यांचे अपघाती निधन
दिवंगत नेते अजित पवार यांचा 28 फेब्रुवारी रोजी बुधवारी विमान अपघात झाला. लँडिंगदरम्यान विमान (Learjet 45) धावपट्टीजवळ कोसळले. यामुळे विमानामध्ये तीन स्फोट झाले. विमानाला लागलेल्या आगीमध्ये सर्व प्रवासी आणि विमान जळून खाक झाले. या विमानाचा अपघात इतका भीषण होता की यामध्ये उपमुख्यमंत्र्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित कपूर आणि सेकंड-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता. गुरुवारी बारामतीतील काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.