KDMC महासभेत राड्याचा इतिहास राहिला आहे तर पोलीस बंदोबस्ताला विरोध कशाला?
KDMC News Marathi: केडीएमसी महासभेदरम्यान पोलिस बंदोबस्त असल्याने काही नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला होता. मात्र केडीएमसीत महासभेदरम्यान यापूर्वी अनेकदा मात्तबर नगरसेवक आणि त्यांचे समर्थक आपसात भिडले आहेत. ज्या प्रकारे आजची परिस्थिती पाहता कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरीता पोलिस बंदोबस्त गरजेचे आहे. याला काही नगरसेवक का विरोध करीत आहेत? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
महापालिकेची सोमवारी महासभा होती. या महासभे दरम्यान अनेक विषय होते. सर्वात महत्वाचे म्हणजे स्थायी, महिला बाल कल्याण आणि शिक्षण समितीवरील सदस्यांची नियुक्ती केली जाणार होती. महासभे आधीच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. १२२ नगरसेवक सभेला येणार होते. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते येतात. मोठ्या संख्येने शहरातील प्रतिष्ठीत नागरीक एका ठिकाणी जमा होता. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता पोलिस बंदोबस्त मागितला गेला असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली. काही नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला.
त्यावर प्रशासनाला सारवासारव करावी. काही नगरसेवकच त्याला विरोध करीत आहेत तर काहींनी त्यांचे समर्थन केलेआहे. महासभे दरम्यान यापूर्वी राडे झालेले आहे. महासभेत मल्लेश शेट्टी रवी पाटील यांचा राडा झाला होता. दिपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे यांच्यासह जयेश म्हात्रे यांच्यात वाद झला होता. नवीन सिंग आणि विश्वनाथ राणे यांच्यातही राडा झाला होता. काही नगरसेवकांचे समर्थक महापालिका मुख्यालयत भिडले होते. काही नगरसेवकांच्या गाड्यांच्या तपासणी दरम्यान त्यांच्या गाड्यातून लाकडी दांडकेड आदी हत्यारे सापडली होती. महासभेत नगरसेवक नागरीकांच्या समस्या मांडण्या करीता येतात. त्यासाठी या वस्तू त्यांना कशासाठी लागतात.
गेल्या वीस वर्षांत नगरसेवकांमधील मतभेदांमुळे सभागृहात वितुष्टावरून जोरदार हाणामाऱ्या झाल्या होत्या. सभागृहावरील प्रेक्षा गॅलरीत रिव्हाॅव्ल्हरची पुंगळी सापडली होती. सहा वर्षापूर्वी दोन नगरसेवकांचे समर्थक आपल्या नगरसेवकाला अर्वाच्च शब्द वापरला म्हणून पालिकेची सुरक्षा तोडून सभागृहात घुसण्यासाठी प्रयत्नशील होते. या गोंधळाने संपूर्ण महापालिका हादरली होती. सामंजस्याने हा विषय नंतर मिटविण्यात आला होता.
ठाकरे पक्षाच्या स्वप्नाली काणे, राहुल कोट यांनी ठाकरे गटाच्या बाजुने सभागृहात बसून आपल्यावरील पक्षांतर बंदी कायद्याने होणारी कायदेशीर टाळली. हे नगरसेवक सभागृहात कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. ठाकरे गटाचे संख्याबळ आता १० झाले.






