Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: नीतिमूल्यांपेक्षा स्वार्थ मोठा! फोडाफोडीच्या राजकारणामुळे प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाला मोठा धोका

Maharashtra Politics: भविष्यातील महत्वाची विधेयके आणि कायदे सहजतेने मंजूर करून घेण्यासाठी सताधारी पक्षांना मोठ्या बहुमताची आवश्यकता असते. त्यामुळे विरोधी पक्षांतील लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 23, 2026 | 12:18 PM
Maharashtra Politics: नीतिमूल्यांपेक्षा स्वार्थ मोठा! फोडाफोडीच्या राजकारणामुळे प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाला मोठा धोका
Follow Us
Follow Us:
  • वैचारिक अधिष्ठान आणि नीतिमूल्यांपेक्षा केवळ वैयक्तिक स्वार्थ आणि सत्तेची गणिते पाहिली जात असल्यामुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात
  • पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदी देखील या नव्या फोडाफोडीच्या राजकारणासमोर कमकुवत
  • सर्वसामान्य मतदारांच्या जनादेशाचा अनादर होत असल्याने जनतेचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होण्याची भीती
प्रा. सुनील देसाई : राजकीय सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र सध्या राज्यासह देशाच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. फोडाफोडीच्या राजकारणातून सत्ता अबाधित राखण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यातून प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.वैचारिक अधिष्ठान, निष्ठा आणि नीतिमूल्यांपेक्षा सत्तेची समीकरणे आणि स्वार्थ यांना अधिक महत्त्व दिले जात असल्याने पक्षांतर बंदी कायद्याच्याही मर्यादा दुय्यम ठरत आहेत. परिणामी, सत्तेसाठी काय पण! अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याचे फोडाफोडीचे राजकारण हे विचारसरणीपेक्षा सत्तेच्या गणितावर आधारित असल्याचे स्पष्ट दिसून येते. पैसा, सत्तेच्या बळावर छोटे, प्रादेशिक पक्ष संपवण्याचेच प्रयत्न सुरू आहेत. Maharashtra Politics

विरोधीपक्षांचा अभाव

मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा अनादर होत असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होण्याची शक्यता वाढली आहे. मजबूत विरोधी पक्षांचा अभाव आणि सत्तेचे केंद्रीकरण यामुळे आव्हाने अधिक गंभीर बनू शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठी राजकीय उलथापालथ मानली जाते. शिवसेनेतील उभी फूट ही नव्या फोडाफोडीच्या राजकारणाची नांदी ठरली.

राजाभाऊ राऊतांच्या विजयाने बार्शीत जल्लोषाचा महास्फोट! फटाक्यांची आतषबाजीत भाजप – महायुती कार्यकर्त्यांनी साजरी केली दिवाळी

प्रादेशिक पक्षांना करावा लागतोय फुटींचा सामना

सन १९९१ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून छगन भुजबळ यांनी बंड करत पक्षाला मोठा धक्का दिला होता. त्यानंतर २००५ मध्ये नारायण राणे यांनीही शिवसेना सोडून वेगळी वाट धरली. पुढे राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचाही जन्म पक्षफुटीतूनच झाला. १९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसपासून वेगळे होत राष्ट्रवादीची स्थापना केली. अलीकडच्या काळात मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही प्रादेशिक पक्षांना फुटींचा सामना करावा लागला.

२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी बहुसंख्य आमदारांना सोबत घेत बंड पुकारले आणि शिवसेना दुभंगली. त्यानंतर २०२३ मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये वेगळा गट निर्माण करत पक्षात उभी फूट घडवून आणली.

भाजपाची ‘वन नेशन, वन पार्टी’कडे वाटलाच, विधान परिषद निकाल

सत्तेत सहभागी होणे वा सत्ता टिकवणे हेच हालचालींचे प्रमुख कारण

दरम्यान, शिवसेनेतील नव्या घडामोडींनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याची चर्चा रंगू लागली असून, त्याचे पडसाद राज्याच्या राजकीय पटलावर उमटत आहेत.

भारतीय संविधानाच्या दहाव्या परिशिष्टानुसार, कोणत्याही आमदार किंवा खासदाराला अपात्रतेपासून वाचण्यासाठी त्यांच्या मूळ विधिमंडळ पक्षातील किमान दोन-तृतीयांश सदस्यांनी विभाजन अथवा विलीनीकरणाचा मार्ग स्वीकारणे आवश्यक असते. या तरतुदीचा आधार घेत अनेकदा संपूर्ण गटच दुसऱ्या पक्षात सामील होत असल्याचे दिसून येते. सत्तेत सहभागी होणे किंवा सत्ता टिकवणे हेच या हालचालींचे प्रमुख कारण असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

लोकशाही मूल्यांपुढे नवे प्रश्न उभे

भविष्यातील महत्वाची विधेयके आणि कायदे सहजतेने मंजूर करून घेण्यासाठी सताधारी पक्षांना मोठ्या बहुमताची आवश्यकता असते. त्यामुळे विरोधी पक्षांतील लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. यामुळे फोडाफोडीचे राजकारण अधिक तीव्र होत असून, त्याचा सर्वाधिक फटका प्रादेशिक पक्षांना बसत आहे.

राजकीय पक्षांतील वाढत्या फुटी, बदलती निष्ठा आणि सत्तेसाठी सुरू असलेली राजकीय जुळवाजुळव यामुळे लोकशाही मूल्यांपुढे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षांतरविरोधी कायद्यात अधिक कठोर सुधारणा करण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व आणि लोकशाहीतील सशक्त विरोधी पक्षाची संकल्पना भविष्यात अधिक कमकुवत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

 

 

Web Title: Maharashtra politics threat to regional parties shivsena ncp split

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ठाकरेंना सुधरेना! 6 खासदार गेले अन् आता 3 आमदार…? ‘ऑपरेशन टायगर’ने लावली वाट
1

Maharashtra Politics: ठाकरेंना सुधरेना! 6 खासदार गेले अन् आता 3 आमदार…? ‘ऑपरेशन टायगर’ने लावली वाट

नाशिकमध्ये महाजन, सामंतांचे प्रयत्न निष्फळ; शेवटी शिंदेंना दणका,  छुप्या रणनीतीचा वापर करत गोकुळ गिते विजयी
2

नाशिकमध्ये महाजन, सामंतांचे प्रयत्न निष्फळ; शेवटी शिंदेंना दणका, छुप्या रणनीतीचा वापर करत गोकुळ गिते विजयी

Top Marathi News Today Live :  अखेर 6 बंडखोर खासदारांनी धरला शिंदेसेनेचा झेंडा
3

Top Marathi News Today Live : अखेर 6 बंडखोर खासदारांनी धरला शिंदेसेनेचा झेंडा

‘माझ्या पक्षाचे खासदार निवडून आले नाहीत, हेच बरे’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
4

‘माझ्या पक्षाचे खासदार निवडून आले नाहीत, हेच बरे’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.