
Rahul Gandhi, Congress Politics,
गेल्या दोन वर्षांपासून राहुल गांधी प्रवास, जाहीर सभा आणि संवादाच्या माध्यमातून जनतेच्या सतत संपर्कात आहेत. भारत जोडो यात्रेपासून ते मतदार हक्क यात्रेपर्यंत, त्यांच्या सभांना मोठी गर्दी जमली आहे. अलीकडील ‘छात्र की गुंज’ कार्यक्रमातही तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला आहे. परंतु या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर करणारी यंत्रणा म्हणजेच बूथ, ब्लॉक आणि जिल्हा संघटना, हाच सर्वात कमकुवत दुवा ठरत आहे.
देशातील अनेक ठिकाणी पुन्हा मुसळधार पाऊस होणार; आसाम, मेघालयसह ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा
उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणासारख्या अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची बूथ-स्तरीय संघटना अस्तित्वातच नाही. ब्लॉक स्तरावर अध्यक्ष असले तरी, कार्यकर्ते अज्ञात आहेत आणि जिल्हा संघटना गटबाजीमध्ये विभागलेली आहे. यामुळेच सभांमधील गर्दी ईव्हीएमपर्यंत पोहोचू शकत नाही. ही कमतरता ओळखून, राहुल गांधींनी संघटना निर्मिती अभियानांतगत जिल्हाध्यक्षांच्या नवीन नियुक्तीला सुरुवात केली आहे. तळागाळातील आणि लढाऊ नेत्यांना संधी देणे हा याचा उद्देश आहे. पण इथेही तीच जुनी समस्या समोर येत आहे.
जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी पाठवले जाणारे बहुतेक निरीक्षक स्वतः लढवलेल्या निवडणुकांमध्ये आपली अनामत रक्कमही वाचवू शकलेले नाहीत. त्यांच्यावर गटबाजीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आधीच झाला आहे. अनेक निरीक्षक गुणवत्तेवर अवलंबून राहण्याऐवजी, काही उच्चपदस्थ नेत्यांची खुशामत आणि ‘प्रतिष्ठा राजकारणा’च्या माध्यमातून पदे मिळवतात. ते ‘तुमचा माणूस, माझा माणूस’ या धोरणाने पछाडलेले अहवाल सादर करतात, ज्यामुळे खरे कार्यकर्ते मागे पडतात आणि या नियुक्त्या दीर्घकाळात संघटनेसाठी समस्या बनतात.
Flood in Nepal : नेपाळमध्ये पुराचा कहर; शेकडो जणांचा मृत्यू, पुराच्या पाण्यासोबतच येत आहेत मृतदेह
वस्तुस्थिती अशी आहे की, आजही राहुल गांधींची धोरणे आणि काँग्रेसची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्याऐवजी, बहुतेक नेते दिल्ली आणि राज्यातील काही मोजक्या वरिष्ठ नेत्यांनाच तोंड दाखवण्यापुरते मर्यादित राहतात. वातानुकूलित खोल्यांमधून राजकारण करणारे हे नेते, मतदान केंद्रांवर जाऊन प्रयत्न करण्यास किंवा कार्यकत्यांना भेटण्यास तयार नसतात. आजही काँग्रेस पक्षात असे अनेक नेते आहेत, जे कार्यकर्त्यांना देवाप्रमाणे वागवण्याऐवजी त्यांना वेठबिगारांसारखी वागणूक देतात. राहुल गांधींचा संघर्ष आणि संघटनेची ताकद यांमधील हीच सर्वात मोठी दरी बनली आहे.