
NCP Reunification News 2026, Sharad Pawar Meeting, Jayant Patil vs Dilip Walse Patil,
NCP Merger Update: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चां सुरू झाल्या होत्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याशी चर्चा सुरू असल्याचेही बोलले जात होते. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आपल्याला आधीच माहिती होते, असा दावा केला. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
हे सर्व सुरू असतानाच आता दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मंगळवारी (३१ मार्च) दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झाली चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत काल वाय बी चव्हाण सेंटरमध्ये वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटची बैठक पार पडली. यावेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र यायला हवे अशी मागणी करण्यात आली. वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटमध्ये झालेल्या या बैठकीला दोन्ही राष्ट्रवादीची आमदार, नेते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील वरिष्ठ नेत्यांची आणि आमदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि पक्ष पुन्हा एकसंध करण्यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांसारख्या दोन्ही गटांतील दिग्गज नेते उपस्थित होते.
बैठकीनंतर दोन्ही पक्षांतील नेत्यांची भावना ‘आपण पुन्हा एकत्र आले पाहिजे’ अशीच असल्याचे समोर येत आहे. तर सुनील तटकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विलीनीकरणाच्या चर्चेला दुजोरा दिला आहे.
NCP Merger News: अजित पवारांची ‘शेवटची इच्छा’ पूर्ण होणार; निकटवर्तीयांचा खळबळजनक दावा
विलीनीकरणाला संमती दर्शवतानाच सुनील तटकरे यांनी नेतृत्वाबाबत एक मोठी अट किंवा ‘सुचक मागणी’ समोर ठेवली आहे. “विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवार यांनच पक्षाचा मुख्य नेता म्हणून स्वीकारायला हवे. अजित पवारांच्या निधनानंतरच्या कठीण काळात सुनेत्रा वहिनींना नेता म्हणून घोषित करण्याची मागणी आमच्याकडून अधिकृतपणे झाली नव्हती. त्या काळात शरद पवार यांच्या गटातील नेते विलीनीकरण कोणत्या टप्प्यावर आहे, यावर भाष्य करत होते, तर आम्ही (अजित पवार गट) मानसिकदृष्ट्या बोलण्याच्या स्थितीत नव्हतो.