
'शिंदे गटात जाण्याबाबत निर्णय..,' कोर्टाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर घेणार मोठा निर्णय
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल आज (शनिवार, 20 जून ) पार पडला. 20 वर्षांनंतर आलेल्या या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी या प्रकरणातील माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 8 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयामुळे निंबाळकर कुटुंबाला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. अश्यातच नुकतेच शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या निकालानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेशाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
ठाकरे गटातून फुटल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरण खटल्याच्या निकालानंतर एक महत्वाचे वक्तव्य केले होते. या खटल्याच्या निकालानंतर शिंदे गटात जाण्याबाबत राजकीय निर्णय घेऊ असे ते म्हंटले होते. आज हा निकाल विरोधात गेल्यानंतर प्रसारमाध्यमंही बोलताना शिंदे गटात जाण्याबाबत अजून निर्णय न घेतल्याचं सांगितलं आहे.
या निकालानंतर माध्यमांशी संवाद साधताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, “शिंदे गटात जाण्याबाबत अद्याप मी निर्णय घेतलेला नाही. मी माझ्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करेल आणि हा निर्णय घेईल. या खटल्याचा निकाल आणि माझा राजकीय निर्णय याचा संबंध नाही. सध्या कलियुग आहे,” असे ते यावेळी म्हणाले.
या प्रकरणात पुढील कायदेशीर लढाईबाबत बोलताना निंबाळकर म्हणाले की, न्याय मिळावा यासाठी आम्ही पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. न्यायालयात असलेले पुरावे योग्य वेळी समोर येतील आणि सत्य बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भावनिक प्रतिक्रिया देताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, “हे कलियुग आहे. वाईटाला जास्त बळ असते, तर चांगल्याला उशिरा बळ मिळते. मात्र शेवटी सत्याचा विजय होतो, अशी आमची श्रद्धा आहे.” राजकीय आणि कायदेशीर घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या ओमराजे निंबाळकरांच्या या वक्तव्याने संबंधित प्रकरणाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
निकाल लागताच ओमराजे निंबाळकर यांचं मोठं वक्तव्य, ‘पोलीस, सीआयडीवर प्रचंड दबाव..,’