
'या' मतदारसंघात राजकीय रंगत; महायुती-महाविकास आघाडीचे उमेदवार मैदानात, 9 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल
याशिवाय अपक्ष उमेदवार म्हणून अहमदखान सय्यद नूर राज सय्यद (माजलगाव), अर्चना विनोद गंगणे (तुळजापूर), सहालबिन आमेर चाऊस (माजलगाव), सचिन भारतराव पवार (धाराशिव), संजय पांडुरंगजी मुंदडा (कळंब), मिलिंद गणपती महालिंगे (चाकूर) आणि शरद रामभाऊ यादव (माजलगाव) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
भाजपाकडून राजेंद्र राऊतांनी दाखल केला अर्ज, जोरदार शक्तीप्रदर्शन, दिग्गजांची उपस्थिती
एकूण ९ उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले असून त्यामध्ये बसवराज पाटील यांनी ४ अर्ज, महेश देशमुख यांनी २ अर्ज आणि अर्चना विनोद गंगणे यांनी २ अर्ज दाखल केले आहेत. उर्वरित सर्व उमेदवारांनी प्रत्येकी एक अर्ज सादर केला आहे. महायुतीचे बसवराज पाटील आणि महाविकास आघाडीचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होण्याची चिन्हे दिसत असली, तरी अपक्ष उमेदवारांच्या उपस्थितीमुळे निवडणुकीत उत्सुकता वाढली आहे. उमेदवारी अर्ज छाननी व माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार महेश माणिकराव देशमुख (पेठसांगवी, ता. उमरगा) यांनीही अर्ज सादर करत निवडणुकीच्या मैदानात दमदार एंट्री केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे.
या मतदारसंघात उस्मानाबाद (धाराशिव), लातूर आणि बीड जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेले सदस्य मतदार म्हणून मतदान करणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील राजकीय समीकरणे निर्णायक ठरणार आहेत. एकाच उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज दाखल करण्याच्या पद्धतीमुळे अर्जांची संख्या अधिक दिसत असली तरी प्रत्यक्ष लढतीचे चित्र अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतर स्पष्ट होणार आहे. अपक्ष उमेदवार, स्थानिक गटबाजी आणि क्रॉस व्होटिंग यांचाही निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता उमेदवारी अर्ज छाननी आणि माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार असून, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची यादी जाहीर, काँग्रेसच्या दिग्गजांसह तरुण उमेदवारही मैदानात