Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सत्तेमध्ये बसलेला हा पूर्णपणे निजामी मराठा अन् मनोज जरांगे निजामी मराठ्यांचे प्रतिनिधी’; प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका

मनोज जरांगेचे आंदोलन चुकीचे आहे. ते रयतेतील मराठ्यांच्या लोकसंख्येवर चालतं. त्याचा असणारा सगळा जो निधी आहे, हा निजामी मराठा पूर्ववत असल्यामुळे जरांगे पाटील हे सुद्धा रयतेतील मराठ्यांचे प्रतिनिधी नाही, असे ते म्हणाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 28, 2025 | 02:58 PM
'सत्तेमध्ये बसलेला हा पूर्णपणे निजामी मराठा'; प्रकाश आंबेडकर यांचा घणाघाती हल्ला

'सत्तेमध्ये बसलेला हा पूर्णपणे निजामी मराठा'; प्रकाश आंबेडकर यांचा घणाघाती हल्ला

Follow Us
Close
Follow Us:

नांदेड : ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “उद्याचा हा मोर्चा ओबीसी आणि भटक्या विमुक्त महासंघाने काढला आहे. उद्याच्या मोर्चामध्ये मी सहभागी होत आहे. 2 ऑक्टोबर रोजी काढलेल्या जीआरच्या विरोधात हा मोर्चा आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करता येत नाही, करण्याचा प्रयत्न केला तर सुप्रीम कोर्ट ते मान्य करणार नाही’, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, दोन वेळा मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करण्याचे महाराष्ट्र शासनाने केलेले प्रयत्न कोर्टाने मान्य केले नाहीत. मराठा समाजातला एक वर्ग निजामी मराठा आहे आणि एक रयतेतील मराठा आहे. हे जोपर्यंत मराठा समाज ऐकत नाही, तोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही. निजामी मराठे निजामाबरोबर राहिले आहेत. रयतेतील मराठी शिवाजी महाराजांसोबत राहिले आहेत. सोळाव्या शतकातील भांडण 22 व्या शतकात सुद्धा चालत आहे अशी परिस्थिती आहे.

तसेच, सत्तेमध्ये बसलेला हा पूर्णपणे निजामी मराठा आहे, निजामी मराठा हा रयतेतील मराठ्यांना आरक्षण देण्याच्या भूमिकेत नाही. जोपर्यंत तो निजामी मराठ्यांकडून फारकत घेत नाही, तोपर्यंत रयतेतील मराठ्याला आरक्षण मिळणार नाही आणि न्यायही मिळणार नाही. शेतीला सपोर्ट प्राईजचा कायदा करावा ही मागणी सुद्धा निजामी मराठा स्वीकारत नाही. निजामी मराठ्यांपासून हरकत घेतल्याशिवाय रयतेतील मराठ्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही, अशी परिस्थिती आहे.

हेदेखील वाचा : Satara Doctor Death Case: सुषमा अंधारेंनी केले सनसनाटी आरोप! रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला 50 कोटींचा मानहानीचा दावा

20 व्या, 22 व्या 25 व्या वर्षी रयतेतील मराठ्याच्या मुलाच्या मुलीचे लग्न होत होतं. पण, आज तिशी ओलांडली तरी लग्न होत नाही, अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडी ओबीसींच्या लढ्यामध्ये ओबीसींच्या बरोबर आहे, असे ते म्हणाले.

जरांगेंचे आंदोलन चुकीचे

जरांगे पाटील यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. मनोज जरांगेंचे आंदोलन चुकीचे आहे. ते रयतेतील मराठ्यांच्या लोकसंख्येवर चालतं. त्याचा असणारा सगळा जो निधी आहे, हा निजामी मराठा पूर्ववत असल्यामुळे जरांगे पाटील हे सुद्धा रयतेतील मराठ्यांचे प्रतिनिधी नाही, ते या निजामी मराठ्यांचा प्रतिनिधी आहे, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Web Title: Prakash ambedkar criticized on manoj jarange and maratha reservation issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Manoj Jarange
  • Prakash Ambedkar

संबंधित बातम्या

‘गडांचे रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची’; खासदार शाहू महाराजांची अपेक्षा
1

‘गडांचे रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची’; खासदार शाहू महाराजांची अपेक्षा

Maharashtra Politics: “शिंदे अन् अजित पवारांनी स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर..; अमित शाहांच्या एका शब्दावरुन सरकार कोसळणार?
2

Maharashtra Politics: “शिंदे अन् अजित पवारांनी स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर..; अमित शाहांच्या एका शब्दावरुन सरकार कोसळणार?

Maharashtra Politics: अमित शहांचा विरोधकांवर घणाघात; म्हणाले, “आगामी काळात होणाऱ्या…”
3

Maharashtra Politics: अमित शहांचा विरोधकांवर घणाघात; म्हणाले, “आगामी काळात होणाऱ्या…”

Mumbai BJP Office: भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन झालेली जागा नक्की कुणाची? भूमिपूजनाच्या दिवशीच रोहित पवारांनी व्यक्त केला संशय
4

Mumbai BJP Office: भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन झालेली जागा नक्की कुणाची? भूमिपूजनाच्या दिवशीच रोहित पवारांनी व्यक्त केला संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.