Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi :- १६ मृत्यूंसाठी निवडणूक आयोग जबाबदार-काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप

राहुल यांचा आरोप हे अपयश नसून एक कट आहे, लोकशाहीचा बळी दिला जात आहे.

  • By Dilip Bane
Updated On: Nov 24, 2025 | 12:07 PM
Rahul Gandhi, election Commission

Rahul Gandhi, election Commission

Follow Us
Close
Follow Us:
  • राहुल गांधी यांनी मतदारयादीच्या एसआयआर विशेष पडताळणी प्रक्रियेवर तीव्र टीका केली.
  • मतदारयाद्या शोधण्यासाठी हजारो पाने स्कॅन करावी लागतात, अशी व्यवस्था EC ने निर्माण केली.
  • राहुल गांधींचा आरोप — मतचोरी अखंडपणे सुरू राहावी यासाठीच ही प्रक्रिया तयार केली आहे.
  • राहुल यांचा आरोप — हे अपयश नसून एक कट आहे, लोकशाहीचा बळी दिला जात आहे.
 

दिल्ली, वृत्तसंस्था. काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी मतदारयाद्यांच्या विशेष पडताळणीवर टीका केली. ते म्हणाले की, एसआयआर ही सुधारणा नाही तर लादलेला त्रास आहे. निवडणूक आयोगाने ( Election Commission )  अशी व्यवस्था निर्माण केली आहे जी मतदारांना कंटाळवेल आणि मतदानाची चोरी अखंडपणे चालू राहील. एसआयआरने देशभरात अराजकता निर्माण केली आहे, ज्यामुळे तीन आठवड्यात १६ बीएलओंचा मृत्यू झाला. निवडणूक आयोगाने लादलेल्या एसआयआरमुळे हृदयविकाराचा झटका, ताण आणि आत्महत्या झाल्या आहेत. एसआयआरद्वारे मतचोरीचा आरोप करत राहुल (  Rahul Gandhi ) म्हणाले की, निवडणूक आयोगाने अशी व्यवस्था निर्माण केली, ज्यामध्ये नागरिकांना स्वतःला शोधण्यासाठी २२ वर्षांच्या मतदारयादीतील हजारो पाने स्कॅन केलेली पाने चाळावी लागतात.

मी स्टार प्रचारक कशाला हिशोब लागतोय; निवडणूक आयोगाबाबत बावनकुळे हे काय गेले बोलून? Video तुफान व्हायरल

कागदपत्रांचे जंगल तयार

राहुल यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकता आणि जबाबदारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ते म्हणाले, भारत जगासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर विकसित करती, परंतु भारतीय निवडणूक आयोग अजूनही कागदपत्रांचे जंगल तयार करण्यावर ठाम आहे. हेतू स्पष्ट असता तर यादी डिजिटल, शोधण्यायोग्य आणि मशीन वाचनीय असती आणि निवडणूक आयोगाने ३० दिवसांच्या धाईघाईत काम पूर्ण करण्याऐवजी पारदर्शकता आणि जबाबदारीवर लक्ष केंद्रित केले असते.
भाजपाने रचला कट
काँग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणाले, हे जाणूनबुजून उचललेले पाऊल आहे, जिथे नागरिकांना त्रास दिला जात असून बीएलओच्या अनावश्यक दबावामुळे होणाऱ्या मृत्यूना संपार्श्विक नुकसान म्हणून दुर्लक्षित केले जात आहे.
है अपयश नाही तर एक कट आहे: सत्तेचे रक्षण करण्यासाठी लोकशाहीचा बळी दिला जात आहे.

Local Body Elections: राष्ट्रवादीच्या 17 उमेदवारांची प्रचारासाठी पायी रॅली; आमदार सुनील शेळकेंनी दिले बळ

६० बीएलओंविरुद्ध गुन्हा-मतदारयादीच्या एसआयआर प्रक्रियेत निष्काळजीपणा केल्याबद्दल उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील ६० बीएलओ आणि सात पर्यवेक्षकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणा, उदासीनता आणि उच्च अधिकाऱ्याऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप करून विविध पोलिस ठाण्यामध्ये हे एफआयआर दाखल करण्यात आले. ४ डिसेंबरपर्यंत सर्व मतदारांची पडताळणी करणे आणि मतमोजणी फॉर्म भरणे अनिवार्य आहे. असे असूनही, अनेक बीएलओ त्यांच्या कामात निष्काळजीपणा दाखवत होते.
बीएलओला धमकी, अटक
मतमोजणी फॉर्मवर ९७ वर्षीय मतदारावी माहिती भरण्याबाबतच्या वादातून बीएलओला धमकावल्याबद्दल बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात एका व्यक्तीला अटक करण्यात आली, एसआयआर प्रक्रियेदरम्यान ही घटना घडली. अटक केलेल्या आरोपीचे नाव जमीरुल इस्लाम मुल्ला असे आहे, जो बसिरहाटच्या नजत भागातील सक्रिय तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. २००२ च्या विशेष पडताळणीच्या मतदारयादीत वृद्ध व्यक्तीचे नाव आढळल्यानंतर मुल्लाने बीएलओला गंभीर परिणामांची धमकी दिल्याचा आरोप आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एसआयआर म्हणजे काय?

    Ans: एसआयआर (Special Intensive Revision) ही मतदारयादीची विशेष पडताळणी प्रक्रिया आहे ज्यामध्ये मतदारांची माहिती पुनः तपासली जाते.

  • Que: निवडणूक आयोगावर कोणते आरोप करण्यात आले?

    Ans: पारदर्शकतेचा अभाव,डिजिटल, शोधण्यायोग्य यादी न देणे, नागरिकांना अनावश्यक कागदपत्रांच्या जंगलात अडकवणे

  • Que: बीएलओंच्या मृत्यूबद्दल काय आरोप आहे?

    Ans: राहुल गांधी यांनी म्हटले की एसआयआरमुळे वाढलेल्या तणावामुळे १६ बीएलओंचा मृत्यू झाल्याचे रिपोर्ट आहेत.

Web Title: Rahul gandhi allegation election commission responsible for 16 deaths controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 12:07 PM

Topics:  

  • Election Comission
  • Indian Political News
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Budget Session 2026: माजी CDS मुकुंद नरवणे यांचे पुस्तक का प्रकाशित होऊ दिले नाही? राजनाथ सिंहांनी दिले उत्तर
1

Budget Session 2026: माजी CDS मुकुंद नरवणे यांचे पुस्तक का प्रकाशित होऊ दिले नाही? राजनाथ सिंहांनी दिले उत्तर

Four Star of Destiny Book : जनरल नरवणे यांच्या पुस्तकात असं आहे तरी काय? ज्यावरुन संसदेमध्ये पेटला वाद
2

Four Star of Destiny Book : जनरल नरवणे यांच्या पुस्तकात असं आहे तरी काय? ज्यावरुन संसदेमध्ये पेटला वाद

संसद हादरली! “…काय साध्य करायचे आहे?” राहुल गांधींच्या चीनच्या ‘त्या’ मुद्द्यावर संरक्षणमंत्र्यांचा विरोध
3

संसद हादरली! “…काय साध्य करायचे आहे?” राहुल गांधींच्या चीनच्या ‘त्या’ मुद्द्यावर संरक्षणमंत्र्यांचा विरोध

Union Budget 2026 : संसदेचे वातावरण तापणार! अर्थसंकल्पावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार
4

Union Budget 2026 : संसदेचे वातावरण तापणार! अर्थसंकल्पावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.