Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi News: विद्यार्थी भाजपवर नाराज; महाराष्ट्रातील परीक्षा आंदोलनावर राहुल गांधींचा इशारा

Rahul Gandhi News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या महत्त्वाच्या आणि घटनात्मक संस्थेवर कब्जा करून तिची स्वायत्तता व विश्वासार्हता पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 07, 2026 | 04:22 PM
Rahul Gandhi, Maharashtra Student Protest, MPSC Protest,

Rahul Gandhi, Maharashtra Student Protest, MPSC Protest,

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातील विविध मागण्यांसाठीच्या विद्यार्थी आंदोलनावर राहुल गांधींचे भाष्य
  • विद्यार्थ्यांचा शासकीय आणि प्रशासकीय सिस्टीमवरील विश्वास उडाल्याचा आरोप
  • MPSC च्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचवल्याचा सरकारवर थेट हल्लाबोल
Rahul Gandhi Criticized Maharashtra Government: विद्यार्थ्यांचे आंदोलन केवळ एका परीक्षा किंवा भरतीपुरते मर्यादित नसून, संपूर्ण व्यवस्थेवरील त्यांचा विश्वासच उडाला आहे, अशा शब्दांत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्य सरकारवर निशामा साधला आहे. महाराष्ट्रात हजारो विद्यार्थी विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करत असताना विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्यावरून राहुल गांधींनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलनावर भाष्य करत, केंद्र असो किंवा राज्य, भाजप सरकारच्या कारभारामुळे विद्यार्थी त्रस्त असल्याचा आरोप त्यांनी केला.

Maratha Reservation Update: मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा १० वा दिवस; मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचे ४ मोठे GR जारी!

 एमपीएससीची विश्वासार्हता उद्ध्वस्त

महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या घटनात्मक संस्थेवर कब्जा करून तिची विश्वासार्हता उद्धवस्त करण्यात आल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रत्येक मागणी योग्य असून सरकारने त्यांचा आवाज ऐकून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांना त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी न्याय मिळणे आवश्यक आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर न्याय मिळेपर्यंत वाढत त्यांच्या आंदोलनाची गूंज अधिकाधिक राहील, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.

 

राहुल गांधींचे प्रमुख आरोप

पेपरफुटी आणि परीक्षामधील गैरप्रकार
रखडलेल्या भरती प्रक्रिया
शिक्षणाचा वाढता खर्च
वसतिगृहांमधील अमानवीय परिस्थिती
निकृष्ट अन्नाबाबतच्या तकारी
एमपीएससीच्या विश्वासार्हतेचर प्रश्नचिन्ह

Manoj Jarange Patil: ‘…तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद पडला पाहिजे’; जरांगे पाटलांचा इशारा

राहुल गांधींचा ‘X’ वर सरकारवर हल्ला

राहुल गांधींनी ‘X’ या सोशल मीडिया राज्य सरकारवर सडकून टिका केली आहे. ” महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. याचे कारण केवळ एक परीक्षा किंवा भरती मोहीम नसून, संपूर्ण व्यवस्थेवरील तुटलेला विश्वास आहे.

केंद्र सरकार असो वा राज्य सरकार, प्रत्येक विद्यार्थी भाजप सरकारला वैतागला आहे. पेपरफुटी, रखडलेली भरती, शिक्षणाचा असह्य खर्च, वसतिगृहातील अमानवीय परिस्थिती, विषारी अन्न, फसवी डीबीटी (DBT) योजना… आणि आता, एमपीएससी (MPSC) सारख्या घटनात्मक संस्थेचा ताबा घेऊन त्यांनी तिची विश्वासार्हता नष्ट केली आहे.

विद्यार्थ्यांची त्यांच्या भविष्यासाठीची प्रत्येक मागणी रास्त आहे. सरकारने त्यांचा आवाज ऐकून तातडीने कारवाई केली पाहिजे – अन्यथा, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या विद्यार्थ्यांचा आवाज वाढतच जाईल.” असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे.

४ सप्टेंबर रोजी पावसातही विद्यार्थ्यांचे आंदोलन

आपल्या हक्कांसाठी ४ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरले. पाऊस असूनही विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यत आल. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला एक निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थी आणि तरुणांच्या जोरदार घोषणांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमला होता.

Operation Tiger 4: ठाकरे गटात भूकंप? ‘ १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, बड्या नेत्याचा दावा

नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

दरम्यान, महाराष्ट्रातील सरकारी अनुदानित आश्रम शाळांची दयनीय अवस्था, सुरक्षा व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या मृत्यूविरोधात नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे. नाशिकमधील ईदगाह मैदानावर १०० हून अधिक आदिवासी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आश्रम शाळांची अवस्था, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि मृत्यूंसंदर्भात सरकारकडून उत्तरे आणि कारवाईची मागणी आंदोलक करत आहेत.

 

 

Web Title: Rahul gandhi criticized maharashtra government on student protest and mpsc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

पृथ्वीराज चव्हाणांची राहुल गांधींसोबत महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा; तब्येतीची विचारपूस करत पुन्हा सक्रिय होण्याचं आवाहन
1

पृथ्वीराज चव्हाणांची राहुल गांधींसोबत महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा; तब्येतीची विचारपूस करत पुन्हा सक्रिय होण्याचं आवाहन

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट
2

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट

Mallikarjun Kharge News: मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेच्या ‘शुद्धीकरण’; भाजप प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा; बंगळूरमध्ये Zero FIR!
3

Mallikarjun Kharge News: मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेच्या ‘शुद्धीकरण’; भाजप प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा; बंगळूरमध्ये Zero FIR!

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात
4

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.