
'उद्धव ठाकरेंचा हिंदूंशी आता काडीमात्र संबंध नाही'; ठाकरे गटाच्या 'राम रक्षा आंदोलनावर' संजय शिरसाटांचा पलटवार
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५ जुलैपासून राज्यभर ‘राम रक्षा आंदोलन’ सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. राम मंदिरातील दानपेटीतील कथित चोरीचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या या भूमिकेवर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरातील दानपेटीतील पैशाचा वापर पक्ष फोडण्यासाठी झाल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, “राजकारणासाठी पैसा वापरला जातो, असे बोलणे बालिशपणाचे आहे. पूर्वी राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसा वाचली म्हणून त्यांना अटक करण्यात आली. आता स्वतः हनुमान चालीसा वाचणार आहात. तुमच्या राजकारणासाठी आता हिंदूंची गरज पडली आहे.”
शिरसाट यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांवरूनही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहून हिंदुत्वाचा नारा देता. आधी त्यांना विचारा की तुमचं हिंदुत्व त्यांना मान्य आहे का? दादरला जाऊन हनुमान चालीसा वाचा आणि आपल्या चुकांसाठी हनुमानाची माफी मागा.”
राम मंदिर आंदोलनाचा उल्लेख करत शिरसाट म्हणाले, “राम मंदिराच्या रथयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. बाबरी ढाचा पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी ‘शिवसैनिकांनी हे केलं असेल तर मला त्यांचा अभिमान आहे’ असे वक्तव्य केले होते. त्या भूमिकेचे श्रेय फक्त बाळासाहेब ठाकरे यांनाच जाते. त्याचे राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका.”
उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनावर शेवटी टीका करत शिरसाट म्हणाले, “संघर्षाच्या काळात आम्ही अयोध्येला गेलो होतो. रामाच्या नावावर राजकारण करण्याची नवी दिशा देऊ नका. हिंदूंशी तुमचा आता काडीमात्र संबंध उरलेला नाही. आधी स्वतःचा पक्ष सावरावा, आजूबाजूच्या लोकांना जागं करावं आणि त्यानंतर देशाचा विचार करावा.”
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरातील दानपेटीतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून ५ जुलैपासून राज्यव्यापी ‘राम रक्षा आंदोलन’ करण्याची घोषणा केली आहे. त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.
‘ऑपरेशन टायगर‘ मध्ये उद्धव ठाकरे यांना आपले सहा खासदार आणि एक विधान परिषद आमदार गमवावा लागला. शिवसेना शिंदे गटात फुटीर खासदारांनी प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अधिक आक्रमकपणे शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरेंनी सभा घेत शिंदेगटावर टीकास्त्र सोडले. आता त्यांनी पुन्हा एकदा राम मंदिर दान चोरी प्रकरणावरून विरोधकांना लक्ष केले असून ते राम रक्षा आंदोलन सुरु करणार आहेत. यावरून आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून शिवसेना शिंदे गटाकडूनदेखील यावर प्रतिक्रिया आली आहे. या आंदोलनामुळे राज्यातील राजकी