Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shaktipeeth Mahamarg News: शेतकऱ्यांच्या विरोधापुढे सरकार झुकलं; शक्तीपीठ महामार्गाचा नकाशा बदलला! ९५% बदल

शक्तीपीठ महामार्गात सर्वात मोठे बदल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमध्ये दिसून आले आहेत. पूर्वी सावंतवाडीतील आंबोली, गेले, फणसवडे इत्यादी १० गावांचा समावेश होता

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 04, 2026 | 02:49 PM
Shaktipeeth Mahamarg New Route Map 2026, Maharashtra Expressway Updates,

Shaktipeeth Mahamarg New Route Map 2026, Maharashtra Expressway Updates,

Follow Us
Close
Follow Us:
  • शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आणि भूसंपादनातील गुंतागुंत
  • शक्तीपीठ महामार्गाचा नकाशा बदलला
  • शक्तीपीठ महामार्गातून जुनी गावे वगळली, नवी जोडली
Shaktipeeth Mahamarg New Route Map: राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या शक्तीपीठ द्रुतगती मार्गाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आणि भूसंपादनातील गुंतागुंत लक्षात घेऊन, सरकारने शक्तीपीठ महामार्गाच्या द्रुतगती मार्गाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी दिली आहे. अंदाजे १ लाख कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत, ज्याचा थेट परिणाम कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर होईल.

प्रमुख बदल कोणते आहेत?

जुन्या नकाशानुसार, शक्तीपीठ द्रुतगती मार्ग वर्ध्यातील पवनारपासून गोवा सीमेवरील पात्रदेवीपर्यंत जाण्याचा प्रस्ताव होता. तथापि, नवीन मार्गानुसार, तो आता वर्ध्यातील दिगराजपासून सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी (बांदा) येथे पोहोचेल. या बदलामुळे द्रुतगती मार्गाची लांबी ८०२ किमी वरून ८५६.७६५ किमी झाली आहे.

बारामती पोटनिवडणुकीसाठी हालचालींना वेग; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

सिंधुदुर्गातील गावांच्या गणितात बदल

शक्तीपीठ महामार्गात सर्वात मोठे बदल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमध्ये दिसून आले आहेत. पूर्वी सावंतवाडीतील आंबोली, गेले, फणसवडे इत्यादी १० गावांचा समावेश होता, पण आता ती वगळण्यात आली आहेत. त्याऐवजी केगड (चौकुळ), देगवे, बांदा, पाडवे माझगाव या गावांचा शक्तीपीठ महामार्गात समावेश करण्यात आला आहे. तर, हा मार्ग आता दोडामार्ग तालुक्यातील कुंभवाडे, भेकुर्ली, कोलझार, तालकट आणि झोळंबे या गावांतून जाईल.

कोल्हापूरला धक्का, साताऱ्याचा समावेश

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ आणि हातकणंगले यांसारखे महत्त्वाचे भाग या योजनेतून वगळण्यात आले आहेत. हा मार्ग आता आजरा-चांदगड-दोडामार्ग मार्गे बांदाला जोडला जाणार आहे. शिवाय, नव्या मार्गात प्रथमच सातारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. वर्धा, यवतमाळ, बीड आणि लातूरकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यात आले आहेत, तर नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या मार्गांमध्ये अंशतः किंवा पूर्णतः बदल करण्यात आले आहेत.

पर्यटनाला चालना, पण पर्यावरणासंबंधी चिंता

हा महामार्ग राज्यातील १३ जिल्हे आणि ४० तालुक्यांना जोडेल, ज्यात २१ महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. यामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास केवळ आठ तासांत पूर्ण करणे शक्य होईल. पण यावरुनही पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे. हा नवीन मार्ग एका पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रातून जातो. घनदाट जंगल आणि जैवविविधतेने समृद्ध भागातून जाणारा हा रस्ता वन्यजीवांसाठी धोकादायक ठरू शकतो, असा दावा पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे.

नागपूर-गोवा प्रवास आता फक्त ८ तासांत! ‘शक्तीपीठ महामार्गा’च्या नव्या आखणीला गती

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) पवनार (वर्धा) ते बांदा (सिंधुदुर्ग) या ‘शक्तीपीठ महामार्गा’चा सुधारित प्रस्ताव सादर केला असून, यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. नव्या आखणीमुळे भूसंपादनातील अडथळे दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Telangana Crime: विकृत मानसिकतेचा कळस! मुलगाच हवा आहे म्हणत बापानेच मुलींसह पत्नीचा जीव घेतला

वेगवान प्रवास: सध्या नागपूर ते गोवा या प्रवासाला साधारण १८ तास लागतात. या महामार्गामुळे हे अंतर कापण्यासाठी केवळ ८ तास लागतील, ज्यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होईल.

विस्तीर्ण जाळे: ८५६.७६५ कि.मी. लांबीचा हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर (Solapur), सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा एकूण १३ जिल्ह्यांमधून जाणार आहे.

धार्मिक पर्यटनाला चालना: हा मार्ग माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर या प्रमुख तीन शक्तीपीठांसह राज्यातील एकूण २१ धार्मिक स्थळांना जोडणारा ठरणार आहे.

 

Web Title: Shaktipeeth mahamarg new map out 95 route changed major setback for kolhapur satara included

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • Maharashtra Politcs
  • Shaktipeeth Mahamarg
  • state government

संबंधित बातम्या

Sanjay Raut On Ashok Kharat : “अशोक खरातांच्या पाठीशी सरकार…”, संजय राऊतांच्या आरोपांनंतर राजकारणात खळबळ
1

Sanjay Raut On Ashok Kharat : “अशोक खरातांच्या पाठीशी सरकार…”, संजय राऊतांच्या आरोपांनंतर राजकारणात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.