Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सत्ता ही येणारी-जाणारी गोष्ट असली तरी…’; शरद पवार यांचं विधान

सत्तेची चिंता करू नका ती येते-जाते. देशाच्या हितासाठी कायम ठाम भूमिका घेतली आहे. जयंत पाटलांनी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांनी सध्या केलेल्या मागणीवर विचार करू

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 10, 2025 | 02:40 PM
जयंत पाटलांच्या 'त्या' मागणीवर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले...

जयंत पाटलांच्या 'त्या' मागणीवर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यामध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये राष्ट्रवादीचा 26 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. यामुळे राष्ट्रवादी समर्थकांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण आहे. युतीची चर्चा सुरु असताना दोन्ही राष्ट्रवादीचे दोन स्वतंत्र मेळावे घेतले जात आहेत. त्यातच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची विनंती केली आहे. त्यावर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया देत जयंत पाटील यांच्या मागणीवर विचार करू, असे सांगितले.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मेळावा पार पडला. 26 व्या वर्धापन दिनी शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. मात्र, शरद पवार यांच्यापूर्वी भाषण करणाऱ्या जयंत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले. शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, ‘सत्तेची चिंता करू नका ती येते-जाते. देशाच्या हितासाठी कायम ठाम भूमिका घेतली आहे. जयंत पाटलांनी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांनी सध्या केलेल्या मागणीवर विचार करू’.

दरम्यान, कोण पक्षातून गेलं याची चिंता करू नका. लोकं येतात-जातात. त्याची चिंता करू नका. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही पुन्हा सत्तेत येणार. तसेच पहलगाम हल्ल्यावर आम्ही कधीही टीका केली नाही. 2-3 महिन्यांत निवडणुका लागतील. त्यासाठी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावं, असेही त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा सामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणांना संधी देणारा पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणांना संधी देणारा पक्ष आहे आणि हीच पक्षाची खरी ओळख आहे. अनेक कार्यकर्ते कष्ट करत करत आज मंत्री, खासदार, उपमुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले. मात्र, आज अनेक जण हयात नाहीत, पण त्यांच्या योगदानाची आठवण ठेवावी लागेल, असे ते म्हणाले. सत्ता ही येणारी-जाणारी गोष्ट असली तरी कार्यकर्त्यांची निष्ठा आणि त्याग कायम स्मरणात राहतो. “रात्री उशिरापर्यंत काम करणारे कार्यकर्ते, लहान घरात राहणारे लोकप्रतिनिधी — हीच पक्षाची ताकद आहे,” असे सांगत त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना सन्मान दिला.

काय म्हणाले जयंत पाटील?

वर्धापन दिनी भाषण करताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदावरुन मुक्त करावे अशी मागणी केली आहे. जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांनी मला सात वर्षे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. आता मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा. प्रदेशाध्यक्ष पदासाठी पक्षाने नवीन चेहऱ्यांना संधी देणे देखील आवश्यक आहे. यानिमित्ताने सर्वांच्या समोर मी शरद पवारांना विनंती करेल की मला प्रदेशाध्यक्षपदावरुन मुक्त करा, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे.

Web Title: Sharad pawar talked about jayant patil demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 01:48 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • political news
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

“आधीच रस्त्याची चाळण असूनही… “; एअर बसेसच्या निर्णयावर राजू पाटलांचा राज्य सरकावर हल्लाबोल
1

“आधीच रस्त्याची चाळण असूनही… “; एअर बसेसच्या निर्णयावर राजू पाटलांचा राज्य सरकावर हल्लाबोल

Maharashtra Politics: ‘रमी’ प्रकरणावरून कोकाटेंची मानहानीची नोटीस; रोहित पवार म्हणाले, “लक्षात ठेवा…”;
2

Maharashtra Politics: ‘रमी’ प्रकरणावरून कोकाटेंची मानहानीची नोटीस; रोहित पवार म्हणाले, “लक्षात ठेवा…”;

“देशाला इंग्रजांपेक्षा जास्त भ्रष्टाचाराने लुटलं…; चिमुकलीचं शाळेत बिंधास्त भाषण, रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर
3

“देशाला इंग्रजांपेक्षा जास्त भ्रष्टाचाराने लुटलं…; चिमुकलीचं शाळेत बिंधास्त भाषण, रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर

Sharad Pawar PC: राधाकृष्णन यांना महाविकास आघाडी पाठिंबा का देणार नाही….? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4

Sharad Pawar PC: राधाकृष्णन यांना महाविकास आघाडी पाठिंबा का देणार नाही….? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.