
आज राज्यभरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान
रत्नागिरी जिल्ह्यात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड
रामदास कदम यांनी दिली प्रतिक्रिया
ZP Election 2026: आज राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान सुरू आहे. राज्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी आज मतदान होत आहे. दरम्यान या निवडणुकीचा निकाल 9 तारखेला सोमवारी लागणार आहे. दरम्यान आज मतदान सुरू असताना अनेक ठिकामी मतदान यंत्र बंद पडणे किंवा त्यात बिघाड होणे असे प्रकार घडले. यावर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाष्य केले आहे.
शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम म्हणाले, “ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. मतदार करत असलेल्या मताची किंमत ही अनमोल, अमूल्य अशी आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी लेखता येणार नाही. मशीनमध्ये बिघाडाची मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे.”
पुढे बोलताम मंत्री रामदास कदम म्हणाले, “या प्रकरणी मी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार आहे. शासन, निवडणूक आयोगाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक आहे. गरज पडल्यास बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, मला त्यात कोणतीही अडचण नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनातील संशय दूर होईल.”
मावळ तालुक्यात शांततेत मतदान; सकाळी 11.30 वाजेपर्यंत 24.45 टक्के मतदानाची नोंद
पंचायत समितीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आज महाराष्ट्रात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. या पार्श्वभूमीवर वावंजा पंचायत समितीसाठी वावंजा गावात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून, विशेषतः महिलांचा प्रतिसाद सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून प्रमुख राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी वावंजा गावात तळ ठोकत कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आहे. तर शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील हेही सकाळपासून गावात फिरून मतदारांशी संवाद साधत आहेत. शिवसेना (शिंदे गट) कडूनही जोरदार हालचाली सुरू आहेत.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : वावंजा पंचायत समितीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांची मोठी गर्दी
सकाळच्या सत्रात मतदानाला संमिश्र प्रतिसाद
सकाळी ७.३० ते ९.३० या पहिल्या दोन तासांत एकूण १८,०३७ मतदारांनी मतदान केले. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात मतदानाचा वेग तुलनेने मंद होता; मात्र ९ नंतर अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.