Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uday Samant on UBT: “गिरे तो भी टांग उपर”, उदय सामंत यांची ‘उबाठा’वर बोचरी टीका; महापालिका निकालावर मांडली रोखठोक भूमिका

शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक उठावानंतरची ही पहिलीच निवडणूक होती आणि या निवडणुकीत महाराष्ट्राने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले आहे, असे सामंत यांनी ठामपणे सांगितले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 17, 2026 | 09:16 PM
उदय सामंत यांची उद्धव ठाकरे गटावर बोचरी टीका (Photo Credit- X)

उदय सामंत यांची उद्धव ठाकरे गटावर बोचरी टीका (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • “गिरे तो भी टांग उपर”
  • उदय सामंत यांची उद्धव ठाकरे गटावर बोचरी टीका
  • महापालिका निकालावर मांडली रोखठोक भूमिका
Maharashtra Politics: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या निकालांवर भाष्य करताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना (UBT) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक उठावानंतरची ही पहिलीच निवडणूक होती आणि या निवडणुकीत महाराष्ट्राने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले आहे, असे सामंत यांनी ठामपणे सांगितले.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

मंत्री उदय सामंत म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात सव्वाचारशेहून अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. महाराष्ट्रातल्या मतदारांचे मी आभार मानतो. जिथे आम्ही कमी पडलो तिथे आम्ही निश्चितपणे आत्मचिंतन करू आणि आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारण्याचा प्रयत्न करू, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.

मुंबईत विकासाचा विजय, महायुतीचाच महापौर

मुंबई महानगरपालिकेच्या निकालांवर बोलताना सामंत म्हणाले की, मुंबईत जे विरोधाचे वातावरण तयार केले गेले होते, त्याला मुंबईकरांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईकरांनी केवळ विकासाला साथ देत महायुतीला मतदान केले आहे. मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार हे आता निश्चित आहे. महापौरपदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रित निर्णय घेतील. आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महापौर पदावर बसवला जाईल.

Maharashtra Politics: महायुती तुटणार? राजकारणात मोठा भूकंप! दोन्ही पवार एकत्र; भाजपचे काय?

उद्धव ठाकरे गटावर टीका: “गिरे तू भी टांग उपर”

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधताना सामंत म्हणाले, “ठाकरे गटाने बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, म्हणूनच त्यांना कुठेही सत्ता मिळवता आली नाही. महाराष्ट्राने त्यांना स्वीकारलेले नाही. त्यांची अवस्था सध्या ‘गिरे तू भी टांग उपर’ अशी झाली आहे. ते ओढूनताणून आपली बेरीज १२० पर्यंत नेत आहेत आणि खोटं रेटून बोलत आहेत.”

राज ठाकरेंच्या मेहनतीवर उबाठाने पाणी फेरले

मनसेच्या कामगिरीवर भाष्य करताना सामंत यांनी खळबळजनक दावा केला. मी आधीच सांगितले होते की या निवडणुकीत सर्वात जास्त फटका मनसेला बसेल. मनसेच्या जिवावर उबाठा पुन्हा छाती फुलवून उभी राहिली आहे. राज ठाकरेंच्या संवेदनशील स्वभावाचा आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्याचा वापर करून उबाठाने त्यांच्यावर भावनिक जाळं टाकलं आणि त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं. मनसेच्या मतांच्या गॅपचा उपयोग करूनच उबाठाच्या जागा वाढल्या आहेत.

‘मामू’चा विजय आणि उबाठाची भूमिका

बाळासाहेबांच्या स्वप्नांना विरोध करणाऱ्या ‘मामू’चा विजय झाल्याचा उल्लेख करत सामंत म्हणाले की, “बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिंदे साहेब प्रयत्न करत असताना ज्याने विरोध केला तो ‘मामू’ निवडून आला, यावरून उबाठाची खरी भूमिका महाराष्ट्रासमोर स्पष्ट झाली आहे.” एमआयएमच्या नगरसेवकांबाबत बोलताना त्यांनी नमूद केले की, लोकशाहीत कोणी कोणाला मतदान करावे हा त्यांचा भाग आहे, परंतु यातून अनेकांनी बोध घेतला पाहिजे.

Maharashtra Politics: ‘एआयएमआयएम’ भाजप की ‘इंडिया’ आघाडीशी युती करणार? ओवेसींनी स्पष्टच सांगितलं…

Web Title: Uday samant press conference bmc results shivsena shinde victory ubt criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • sanjay raut
  • Shivsena UBT
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Israel-Iran War : Epstein Filesवरुन लक्ष वळवण्यासाठी हे विनाशकारी युद्ध; खासदारांचा मोठा दावा, चर्चांना उधाण
1

Israel-Iran War : Epstein Filesवरुन लक्ष वळवण्यासाठी हे विनाशकारी युद्ध; खासदारांचा मोठा दावा, चर्चांना उधाण

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन
2

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन

संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर…; भाजप नेत्याने दिले आव्हान
3

संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर…; भाजप नेत्याने दिले आव्हान

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये
4

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.