
“या, परत या... शिवसेना आपलीच”; खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंची भावनिक साद
ठाकरे म्हणाले की, दोन तृतियांश बहुमत मिळवून संविधानात बदल करण्यासाठी आणि डिलिमिटेशनच्या माध्यमातून लोकशाहीची ताकद कमी करण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. मात्र महाराष्ट्रातील जनतेने आणि विरोधी पक्षांनी याला रोखण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. भविष्यात मतदारसंघ पुनर्रचनेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय प्रतिनिधित्वावर परिणाम होऊ शकतो आणि सामान्य मतदाराच्या मताची ताकद कमी होऊ शकते, असा दावा त्यांनी केला. त्यांनी कार्यकर्त्यांना सावध राहण्याचे आवाहन करत लोकशाही व संविधानाचे रक्षण करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
‘गद्दार खासदार जिथे सापडतील तिथेच..’; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना थेट आदेश, भाजपवरही घणाघात
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध प्रश्नांवरही भाष्य केले. ठाण्यातील कथित पेपरफुटी आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहारांचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर टीका केली. अशा घटनांकडून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. “मला शिवसेनेची सत्ता पाहिजे, कारण मला न्याय द्यायचा आहे. मला शिवसेनेचा खासदार पाहिजे,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा संघटित होण्याचे आवाहन केले.
सभेतील सर्वात भावनिक क्षणी उद्धव ठाकरे यांनी पक्षातून दूर गेलेल्या आणि नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना थेट साद घातली. “जे कोणी नाराज होऊन दुसरीकडे गेले असतील, त्यांनी परत यावे. शिवसेना आपलीच आहे. गद्दारांमुळे कोणी दूर गेले असेल तर पुन्हा पक्षात या,” असे आवाहन त्यांनी केले.
तसेच निष्ठावंत शिवसैनिकांनी एकत्र येऊन पक्ष मजबूत करावा आणि बंडखोरांना लोकशाही मार्गाने उत्तर द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, वाशिममधून ‘या’ शिवसैनिकाला मिळणार खासदारकीची उमेदवारी