Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात माऊलींच्या पालखीचे प्रस्थान; जाणून घ्या रिंगण सोहळ्याचे महत्त्व

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला ८ जुलै रोजी आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरातून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. या वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. विठूनामाचा गजर करत वारकरी पंढरपुरात पोहोचतात. या पालखी सोहळ्याबद्दल जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 09, 2026 | 11:55 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
  • पालखी परंपरेचा काय आहे इतिहास
  • रिंगण सोहळ्याचे महत्त्व
 

 

आषाढी वारीचे मुख्य आकर्षण असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे बुधवार, ८ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरातून भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषात हजारो वारकरी, दिंड्या, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने माऊलींच्या पादुका पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.

पालखी परंपरेचा इतिहास

संत ज्ञानेश्वर महाराजांनी इ.स. १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. त्यांच्या पादुकांची पालखी पंढरपूरला नेण्याची सुव्यवस्थित परंपरा सुमारे 200 वर्षांपूर्वी ह.भ.प. हैबतबाबा आरफळकर यांनी 19 व्या शतकाच्या पूर्वार्धात सुरू केली. त्यानंतर ही परंपरा अखंड सुरू असून आज ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अस्मितेचे प्रतीक बनली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीला 700 हून अधिक वर्षांची आध्यात्मिक परंपरा लाभली आहे. पालखीची संघटित परंपरा सुमारे दोन शतकांपासून सुरू आहे, तर संत ज्ञानेश्वरांच्या पंढरपूर वारीची परंपरा सातशे वर्षांहून अधिक काळ अखंड सुरू असल्याचे मानले जाते.

पालखीचा प्रमुख मार्ग

यंदा माऊलींची पालखी पुढील प्रमुख मुक्कामांद्वारे पंढरपूरकडे मार्गक्रमण करणार आहे.

आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, वाखरी, पंढरपूर.

२४ जुलै रोजी पालखी वाखरीमार्गे पंढरपुरात दाखल होईल आणि २५ जुलै रोजी आषाढी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतील.

Ashadhi Ekadashi 2026: चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्याचे काय आहे महत्त्व, जाणून घ्या

 

परतीचा प्रवास

आषाढी एकादशीचे दर्शन आणि गोपाळकाला सोहळ्यानंतर माऊलींची पालखी परतीच्या प्रवासाला सुरुवात करते. पंढरपूरहून निघालेली पालखी पारंपरिक मार्गाने विविध मुक्काम करत पुन्हा आळंदीकडे प्रस्थान करते. यंदाच्या नियोजनानुसार सुमारे ३३ दिवसांचा संपूर्ण प्रवास पूर्ण करून ८ ऑगस्ट रोजी पालखी पुन्हा आळंदीतील संजीवन समाधी मंदिरात परतणार आहे.

वारीचा संदेश

ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही केवळ धार्मिक यात्रा नसून समता, सेवा, शिस्त, त्याग आणि नामभक्तीची चालती-बोलती विद्यापीठ आहे. जाती-पाती, श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न मानता लाखो वारकरी “माऊली”च्या चरणी एकरूप होतात. म्हणूनच आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा जिवंत वारसा आणि भारतीय भक्ती संस्कृतीचे अद्वितीय प्रतीक मानली जाते.

Ashadhi Ekadashi 2026: विठुरायाचे दर्शन होणार सुलभ! वारकऱ्यांची सोय

मुख्य आकर्षण रिंगण सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये सोहळ्यातले एक महत्वाचे आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा. हा कार्यक्रम पालखीत सहभागी वारकऱ्यांबरोबरच स्थानिक लोकांचा आणि माध्यमांच्या आकर्षणाचा विषय असतो. रिंगण म्हणजे एक प्रकारचा खेळ म्हणता येईल. रिंगणचा शब्दशः अर्थ म्हणजे वर्तुळ. रिंगण म्हणजे म्हणजे पालखी भोवती गोल फिरणे. रिंगणचे ठिकाण म्हणजे मोठे मैदान. प्रत्येक पालखी सोहळ्याची रिंगणाची ठिकाणे ठरलेली आहेत. रिंगणासाठी पालखी सोहळ्यातील भाविकांच्या संख्येनुसार मोकळी जागा लागते. काही सोहळ्यांमध्ये सहभागी वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येनुसार रिंगणाची जागा बदलण्यात आली आहे. पालखी सोहळा वाटचाल करत रिंगणाच्या ठिकाणी पोहोचतो तेव्हा आधी चोपदार रिंगण लावतात. यामध्ये मध्यभागी पालखी, पालखीच्या सभोवती पताकाधारी वारकरी आणि दिंड्या, त्याभोवती रिंगणासाठी मोकळी जागा आणि पुन्हा त्याभोवती दिंड्या व रिंगण बघायला आलेले भाविक उभे राहतात. रिंगण लावणे हे कौशल्याचे काम आहे. चोपदारांचे कौशल्य व वारकऱ्यांची शिस्त याठिकाणी दिसून येते. रिंगण हे २ प्रकारचे होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: रिंगण सोहळा म्हणजे काय?

    Ans: रिंगण सोहळा हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे. यात पालखीभोवती ठरावीक पद्धतीने रिंगण भरवले जाते.

  • Que: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कुठून सुरू होते?

    Ans: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथील संजीवन समाधी मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान करते.

  • Que: पालखी सोहळ्यात कोण सहभागी होतात?

    Ans: लाखो वारकरी, दिंड्या, टाळ-मृदुंग वादक, फडकरी आणि विविध भागांतील भाविक या सोहळ्यात सहभागी होतात.

Web Title: Importance of the palkhi departure ceremony of sant dnyaneshwar maharaj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Ashadhi Wari
  • Dnyaneshwar Maharaj Palkhi

संबंधित बातम्या

दुथडी भरलेली इंद्रायणी क्षणभर थांबली! वारकरी विठूनामात दंग; संत ज्ञानेश्वर माऊलींचे पंढरीकडे प्रस्थान
1

दुथडी भरलेली इंद्रायणी क्षणभर थांबली! वारकरी विठूनामात दंग; संत ज्ञानेश्वर माऊलींचे पंढरीकडे प्रस्थान

स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ वारीसाठी प्रशासनाची तयारी! चंद्रभागा नदीपात्रात ५० स्वच्छता कर्मचारी, ३० ते ३२ लाख भाविकांसाठी नियोजन
2

स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ वारीसाठी प्रशासनाची तयारी! चंद्रभागा नदीपात्रात ५० स्वच्छता कर्मचारी, ३० ते ३२ लाख भाविकांसाठी नियोजन

Saint Tukaram Maharaj Palkhi: संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा गौरवशाली इतिहास, वारकरी परंपरा आणि भक्तीचा महासागर
3

Saint Tukaram Maharaj Palkhi: संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा गौरवशाली इतिहास, वारकरी परंपरा आणि भक्तीचा महासागर

Ashadhi Ekadashi 2026: चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्याचे काय आहे महत्त्व, जाणून घ्या
4

Ashadhi Ekadashi 2026: चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्याचे काय आहे महत्त्व, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.