
ज्योतिबाच्या देवस्थानाची एक दंतकथा सांगितली जाते, या आख्यायिकेनुसार असं झालं होतं की, गावात रत्नासूर असूराने खूप उपद्रव घातला होता. रत्नासुर आणि कोल्हासुर या राक्षसांनी निरपराध लोकांना विनाकारण त्रास देत होती. देवांवरचा लोकांचा विश्वास उडेल आणि असूरांची सत्ता निर्माण करता येईल या उद्देशाने या असूरांना आपल्या शक्तीचा वाईट अर्थाने वापर केला. त्य़ामुळे नी देव, ऋषी आणि सामान्य जनतेमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. असूरांच्या अत्याचारांमुळे सर्व देवता चिंतेत पडल्या. काय करावं कोणाला काहीच कळत नव्हतं. त्यावेळी करवीर निवासिनी आई अंबाबाईने या असूरांचा वध करण्यासाठी आपल्या मदतीला केदारनाथची उपासना केली. आई अंबाबाईच्या मदतीसाठी तेव्हा केदारनाथ धावून आले. असूरांचा वध करण्याची मोहिम केदारनाथांनी स्विकारली. कोल्हासूर असूराचा वध आई अंबाबाईने केला तर रत्नासूर या असूराचा वध साक्षात केदारनाथांनी केला. केदारनथांनी रत्नासूराचा वध करण्यासाठी जे रुप धारण केलं तो म्हणजे ज्योतिबा.
मोहिम पूर्ण झाल्यावर देव पुन्हा हिमायलाकडे निघत होते. त्यावेळी देवी अंबाबाईने केदारनथांना थांबण्यासाठी अनवाणी धावत गेल्या. त्यावेळी केदारनाथ कोल्हापूरच्या एका डोंगरापर्यंत पोहोचले होते. त्यावेळी अंबाबाईने केदारनाथांना विनंती केली की तुम्ही करवीरनगरीच्या रक्षणासाठी इथेच थांबा. केदारनाथांनी ती विनंती मान्य केली. त्य़ादिवसापासून वाडी रत्नागिरी हे दख्खनच्या राजाचं स्थान बनलं. रत्नासूराचा वध केला त्या राजाचा डोंगर म्हणजे वाडी रत्नागिरी. असं देखील म्हटलं जातं की, असूरांचा वध करण्यासाठी महादेव, ब्रह्मा आणि विष्णू या त्रिदेवांनी एकत्र येऊन एक शक्तिशाली रूप धारण केलं. या दिव्य शक्तीमधून ‘ज्योतिबा’ या देवतेचा अवतार झाला.क्षसांचा वध केल्यानंतर ज्योतिबा वाडी-रत्नागिरीच्या डोंगरावर स्थायिक झाले. आजही तेथे त्यांचे भव्य मंदिर असून चैत्र महिन्यात मोठ्या उत्साहात यात्रा भरते. या यात्रेत लाखो भाविक सहभागी होऊन ज्योतिबाची मनोभावे पूजा करतात.