
फोटो सौजन्य- pinterest
महाशिवरात्र ही भगवान शिवांना समर्पित पवित्र सण आहे. या सणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. यावर्षी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात सर्वजण रविवार, 15 फेब्रुवारी रोजी साजरा करणार आहेत. हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भक्त उपवास करतात, शिवमंदिरांना भेट देतात आणि रात्रभर जागरण करतात. उपवासासोबतच काही उपाय देखील केले जातात. मात्र महाशिवरात्रीच्या काही कथा देखील प्रसिद्ध आहेत त्या तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घेऊया महाशिवरात्रीशी संबंधित असलेली कथा
पौराणिक कथेनुसार, एकदा एक पारधी जंगलात सावध शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला पण त्याला काही शिकार मिळेना संध्याकाळी हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला पारधी बाण सोडणार तेवढ्यात तेथील एक हरीण पुढे येऊन पारध्याला म्हणाला हे पारध्या तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबियांना एकदा भेटून येऊ दे आणि माझी कर्तव्य मला पार पाडून येऊ देत.
हरणाने वचन दिल्यामुळे पारध्याने त्याची विनंती मान्य केली त्याचवेळी दूरवरून मंदिरातील घंटाचे आवाज देखील येत होते. ओम नमः शिवाय कानावर येत होतं. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. सहज चाळा म्हणून एकेक पान तो खाली टाकत होता पण त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडाचे त्यालाच काही माहिती नव्हते. शिवपिंडावरती बेलाची एकेक पान पडत होती नकळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिवउपासना घडत होती हरीण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले आता तू मला मार मी माझे कुटुंबप्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे.
तेव्हा लगेचच हरणाची पत्नी पुढे आली तिने म्हटले त्यांना नको मला मार. मला माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे त्वरित हरणाची लहान पिल्लं देखील पुढे आली आणि म्हटली आईला नको आम्हाला मार. आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू देत हे पाहता पारध्याच्या मनात विचार आला हे प्राणीमात्रा असून देखील आपाल्या कर्तव्याला चुकले नाही आहेत तर मी मानव धर्म आणि द्याधर्म का सोडू? त्याने सर्वांना जीवदान दिले. देवाधिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावरती आणि पारध्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना आशीर्वाद दिले. सर्वांचा उद्धार केला हरणाला मृगनक्षत्र म्हणून आणि पारध्याला व्याग्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्यावेळी घडला तो दिवस होता महाशिवरात्रीचा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: ही कथा भक्ती, करुणा आणि अनवधानाने केलेल्या पूजेचे महत्त्व सांगते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवकृपेचा संदेश देण्यासाठी ही कथा प्रचलित आहे.
Ans: एक पारधी शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता. रात्री तो झाडावर बसून राहिला आणि खाली असलेल्या शिवलिंगावर नकळत बिल्वपत्र आणि पाणी टाकले.
Ans: श्रद्धेनुसार या दिवशी ही कथा ऐकल्यास शिवकृपा प्राप्त होते आणि मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.