शिवपिंडीचा हा रहस्यमय अनुभव घेण्यासाठी भाविक दर्शनसाठी जातात ते श्री कालेश्वर मुक्तेश्वर स्वामी मंदिरात. मंदिर दाक्षिणात्य शैलीतील हे मंदिर डोळ्यांचं पारणं फेडतं. साधं पण सुंदर दिसणारं हे मंदिर मात्र तितकंच गुढ आहे. असं म्हटलं जातं की, या मंदिरातील पाण्याचा अभिषेक केल्यानंतर ते पाणी शिवपिंड शोषून घेते. या मंदिरात दोन शिवपिंड आहेत. त्यातील पहिली म्हणजे कालेश्वर. हे कालेश्वर म्हणजे मृत्यूची देवता असं मानलं जातं. तर झालं असं की, पुराणकथेनुसार, याच ठिकाणी यमराजाने तपस्या करुन महादेवांना प्रसन्न केलं. तेव्हा महादेवांनी यमराजाला वर दिला की, या ठिकाणी मंदिर बांधल्यानंतर पहिले यमराजाचं दर्शन घेतलं जाईल. त्यानंतर शिवपिंडींचं दर्शन घेतलं जाईल. त्यांनतर पडलेली ही परंपरा आजतागायत सुरु आहे. आणि यात भाविकांनी कधीही खंड पडू दिला नाही.
त्यानंतर येतं ते मुक्तेश्वर शिवपिंड. कालेश्वर पिडींची उपसना केल्यावर भाविक मुक्तेश्वर पिडींची पूजा करतात. या पिंडींच रहस्य अजूनही उलगडलेलं नाही. तर गोष्ट अशी की, या शिवलिंगाला दोन छिद्र आहेत असं म्हटलं जातं. ज्यामुळे दुधाचा किंवा पाण्याचा केलेला जलाभिषेक पिंडीवरुन खाली वाहत नाही तर ते पाणी किंवा दूध ही शिवपिंड शोषून घेते, असं सांगितलं जातं. या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने आलेले भाविक इथे जो ही अभिषेक करतात ते पाणी कधीही बाहेर येत नाही असं मंदिराचे पुजारी आणि भाविक देखील सांगतात.
असं म्हटलं जातं की हे पाणी नदीमध्ये विलिन होतं. हे पाणी गोदावरी नदीत सामावून जातं. मात्र आजपर्यंत हे पाणी शिवपिंडींच्या छिद्रातून नदीत कसं काय जातं याचं गूढ उकललेलं नाही.हे रहस्यमय मंदिर आहे ते तेलंगणामध्ये. या मंदिराला दक्षिण काशी असं देखील म्हटलं जातं. गोदावरी आणि प्राणहिता आणि सरस्वती या तीनही नद्यांच्या संगमावर हे मंदिर स्थित आहे. या मंदिराचं पावित्र्य भाविकांनी आजवर राखलं आहे. अशी मान्यता आहे की, मुक्तेश्वर कालेश्वर मंदिरातील महादेवांचं दर्शन घेतल्यावर जीवन मरणातून मुक्ती मिळते आणि मोक्षाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो.






