Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

August Kranti Diwas: 9 ऑगस्ट 1942 ची ती ऐतिहासिक पहाट! काँग्रेस नेत्यांना अटक अन् आंदोलनाची सूत्रे जनतेच्या हाती; वाचा रंजक इतिहास

Kranti Diwas : दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी साजरा होणारा क्रांती दिवस, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. १९४२ साली याच दिवशी महात्मा गांधींनी 'भारत छोडो!' ही घोषणा देत भारत छोडो आंदोलन सुरू केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 09, 2026 | 10:30 AM
august kranti diwas 9 august quit india movement history marathi news

august kranti diwas 9 august quit india movement history marathi news

Follow Us
Follow Us:
  • स्वातंत्र्यलढ्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट
  • ‘करो या मरो’चा ऐतिहासिक नारा
  • ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना अभिवादन

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान इतिहासात ९ ऑगस्ट या तारखेला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात ‘ऑगस्ट क्रांती दिवस’ (August Kranti Din) म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो. सन १९४२ मध्ये याच दिवशी महात्मा गांधीजींनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध ‘भारत छोडो’ (Quit India Movement) आंदोलनाची अधिकृत सुरुवात केली होती. ही केवळ एक राजकीय चळवळ नव्हती, तर गुलामगिरीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीय जनतेने पुकारलेले ते अंतिम आणि निर्णायक युद्ध होते. या आंदोलनाने ब्रिटिशांच्या शोषक राजवटीचा पाया इतका हादरवून टाकला की, त्यांना भारत सोडणे भाग पडले.

८ ऑगस्ट १९४२ च्या रात्री मुंबईतील ऐतिहासिक ‘गोवालिया टँक’ मैदानावर (ज्याला आज आपण ‘ऑगस्ट क्रांती मैदान’ म्हणून ओळखतो) अलोट जनसमुदायासमोर बोलताना महात्मा गांधींनी देशाला ‘करो या मरो’ (Do or Die) हा अजरामर मंत्र दिला. या भाषणाने भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वातंत्र्याची आणि आत्मसन्मानाची ठिणगी पेटवली. इंग्रजांना भारतातून उखडून टाकण्यासाठी आणि संपूर्ण स्वराज्याच्या प्राप्तीसाठी ही लढाऊ हाक देण्यात आली होती. ९ ऑगस्टच्या भल्या पहाटेच ब्रिटिश सरकारने दडपशाहीचे धोरण अवलंबत महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह काँग्रेसच्या अग्रगण्य नेत्यांना अटक केली.

Do you know why 8 August holds a special place in Indian history? 🇮🇳 QUIT INDIA MOVEMENT: 8th August 1942. • On 8th August 1942, the All India Congress Committee passed the historic ‘Quit India Resolution’ in Bombay. • The resolution demanded an immediate end to British rule… pic.twitter.com/voQbiH95zp — Ayush 🇮🇳 (@_likerainydays) August 8, 2026

credit – social media and Twitter

गांधीजी आणि वरिष्ठ नेत्यांच्या अचानक झालेल्या अटकेमुळे आंदोलन थांबेल असा ब्रिटिशांचा अंदाज होता. परंतु, घडले भलतंच! नेत्यांच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच हे आंदोलन सामान्य जनतेच्या हाती गेले आणि त्याचे रूपांतर एका प्रचंड उत्स्फूर्त जनआंदोलनात झाले. तरुणाई, शेतकरी, कामगार आणि महिला रस्त्यावर उतरल्या. अरुणा असफ अली यांनी ब्रिटिश पोलिसांची लाठीमार आणि अश्रूधुराची तमा न बाळगता गोवालिया टँक मैदानावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा ध्वज फडकवून आंदोलनाचे नेतृत्व सांभाळले. महाराष्ट्रात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात स्थापन झालेले ‘प्रतिसरकार’ हे या आंदोलनाचे एक देदीप्यमान उदाहरण ठरले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: युक्रेन युद्धातून तोडगा न निघाल्यास पुतीन सुरु करणार तिसरे महायुद्ध; ‘हे’ NATO देश रडारवर, अमेरिकेचा दावा

क्रांती दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्या वीरांनी आणि हुतात्म्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या अतुलनीय त्यागाचे स्मरण करणे हे आहे. या आंदोलनात हजारो देशभक्तांनी पोलिसांच्या लाठ्या-गोळ्या झेलल्या आणि कारावास भोगला. ९ ऑगस्ट हा केवळ भूगोलाचा किंवा इतिहासाचा भाग नसून तो आपल्या राष्ट्रीय अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा हुंकार आहे. आजच्या युगात देशप्रेम आणि ‘राष्ट्रीय हित सर्वोपरि’ हा विचार नव्या पिढीच्या मनावर बिंबवण्यासाठी या दिवसाचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते.

दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी देशभरातील शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि सामाजिक संस्थांमध्ये क्रांती दिन उत्साहाने पाळला जातो. या दिवशी हुतात्मा स्मारकांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले जाते. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये देशभक्तीपर गीते, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, नाट्यछटा आणि चित्ररथांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास तरुण पिढीसमोर जिवंत केला जातो आणि देशाच्या अखंडतेचे आणि एकतेचे रक्षण करण्याची शपथ घेतली जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; इंजिन रूम आगीच्या भक्ष्यस्थानी, रेडिओ संदेशाने जगभरात खळबळ

आज आपण ज्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, त्या स्वातंत्र्याची किंमत किती अथांग होती, याची जाणीव ऑगस्ट क्रांती दिवस आपल्याला करून देतो. आधुनिक भारताच्या निर्मितीत आणि लोकशाही मजबूत ठेवण्यात प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य काय असावे, याचे भान हा दिवस देतो. ऑगस्ट क्रांती दिनाच्या पावन प्रसंगी स्वातंत्र्यलढ्यातील सर्व हुतात्म्यांना आणि क्रांतीवीरांना कोटी कोटी प्रणाम!

Web Title: August kranti diwas 9 august quit india movement history marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

August 9 History: आज कांती दिवस; जाणून घ्या ९ ऑगस्टचा इतिहास..
1

August 9 History: आज कांती दिवस; जाणून घ्या ९ ऑगस्टचा इतिहास..

World Tribal Day 2026: ‘ट्रेडिंग रील्स’ ते ‘सांस्कृतिक वारसा’! नव्या पिढीसमोर कशी येतेय आदिवासी लोककला?
2

World Tribal Day 2026: ‘ट्रेडिंग रील्स’ ते ‘सांस्कृतिक वारसा’! नव्या पिढीसमोर कशी येतेय आदिवासी लोककला?

FSSAIच्या कारवाईमुळे चर्चेत आली ‘Old Monk’ रम; जाणून घ्या जालियनवाला बाग हत्याकांडाशी कसा आहे ‘या’ ब्रँडचा ऐतिहासिक संबंध?
3

FSSAIच्या कारवाईमुळे चर्चेत आली ‘Old Monk’ रम; जाणून घ्या जालियनवाला बाग हत्याकांडाशी कसा आहे ‘या’ ब्रँडचा ऐतिहासिक संबंध?

International Cat Day : घरात मांजर पाळण्याचे ‘हे’ 5 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का? वाचा ‘ही’ विशेष माहिती
4

International Cat Day : घरात मांजर पाळण्याचे ‘हे’ 5 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का? वाचा ‘ही’ विशेष माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.