
Dinvishesh
Dinvishesh : मराठी संगीत रंगभूमीचा सुवर्णअध्याय म्हटले की आठवतात ते म्हणजे बालगंधर्व म्हणजेच नारायण श्रीपाद राजहंस यांचा आज स्मृतिदिन आहे. ज्यांनी आपल्या सुरेल आवाजाने आणि स्त्री भूमिकांतील अप्रतिम अभिनयाने प्रक्षेकांच्या मनावर राज्य केले. त्या काळी महिलांना रंगभूमीवर अभिनय सादर करण्यास मान्यता नव्हती. त्यावेळी बालगंधर्वंनीच स्त्री भूमिका साकारली. त्यांच्या या भूमिका आजही अभिनयाचा आदर्श मानल्या जातात. संगीत मानपान, सौभद्र यांसारख्या नाटकांनी त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यांचे नाटक पाहिल्यानंतर त्यांना बालगंधर्व ही पदवी बाळ गंगाधर टिळक यांनी बहाल केली आणि यानंतर त्यांना याच नावाने संबोधले जाऊ लागले. त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. १५ जुलै १९५७ रोजी त्यांचे निधन झाले. पण मराठी रंगभूमीवरील त्यांचे योगदान आजही अजरामर आहे.
15 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
15 जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)