
पुस्तक आणि लेखक हे प्रामुख्याने शहरी आणि सुशिक्षित वर्गापुरते मर्यादित
आज आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
ग्रामीण भागातून पुढे येत आहेत नवोदित लेखक
पुणे: पूर्वी पुस्तक आणि लेखक हे प्रामुख्याने शहरी आणि सुशिक्षित वर्गापुरते मर्यादित मानले जात होते मात्र बदलत्या सामाजिक आणि तांत्रिक परिस्थितीमुळे मराठी साहित्याचे स्वरूप झपाट्याने बदलताना दिसत आहे. ग्रामीण भागातून (navarashtra Special) मोठ्या प्रमाणात नवोदित लेखक साहित्य क्षेत्रात पुढे येत असून त्यांच्या लेखनातून गावकुसातील वास्तव, स्थानिक संस्कृती, संघर्ष आणि बदलत्या सामाजिक प्रवाहांचे जिवंत चित्र साहित्याच्या माध्यमातून समोर येत आहे. परिणामी मराठी साहित्याचा केंद्रबिंदू हळूहळू ग्रामीण भागाकडे सरकत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
आज (२१ फेब्रुवारी) साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी साहित्याच्या बदलत्या प्रवाहाचा वेध घेतला असता, साहित्यनिर्मिती आता शहरांपुरती मर्यादित राहिली नसून शिक्षणाचा वाढता प्रसार, इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांची सहज उपलब्धता तसेच स्वप्रकाशनाच्या वाढलेल्या संधींमुळे ग्रामीण लेखकांना स्वतःचे अनुभव आणि विचार थेट वाचकांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे.
शेती, दुष्काळ, स्थलांतर, ग्रामीण अर्थकारण, बदलती कुटुंबव्यवस्था, शिक्षणातील आव्हाने तसेच नव्या पिढीच्या आकांक्षा या विषयांना आजच्या साहित्यामध्ये विशेष स्थान मिळत आहे. वास्तववादी मांडणी आणि अनुभवसंपन्न लेखनामुळे वाचकांना ग्रामीण जीवनाचे अधिक जवळून दर्शन घडत असून मराठी साहित्य अधिक लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक बनत असल्याचे साहित्यिकांचे म्हणणे आहे.
Oceanographic Research 2026: धोक्याची घंटा! हिंद महासागरात वाहतेय गोडे पाणी, शास्त्रज्ञ चिंतेत
बोलीभाषांना मिळतेय नवे व्यासपीठ
ग्रामीण लेखकांच्या लेखनामुळे स्थानिक बोलीभाषांना नवे व्यासपीठ मिळत आहे. पूर्वी प्रमाण मराठीपुरते मर्यादित असलेले साहित्य आता विविध प्रादेशिक बोली, लोकजीवनातील शब्दसंपदा आणि सांस्कृतिक संदर्भांनी अधिक समृद्ध होत आहे. त्यामुळे बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन नैसर्गिकरित्या घडत असून मातृभाषेच्या संवर्धनाला नवी दिशा मिळत आहे.
ग्रामीण लेखकांचा वाढता सहभाग केवळ साहित्य समृद्ध करत नसून भाषेच्या मुळांशी असलेले नातेही दृढ करत आहे. ग्रामीण वास्तवावर आधारित पुस्तकांना वाचकांची अधिक पसंती मिळत असून साहित्य क्षेत्राच्या तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी हा महत्वाचा बदल आहे
– घनश्याम पाटील, प्रकाशक
Galgotias Robo Case: ‘गलगोटिया रोबो’ने भारताची मान खाली झुकवली! एआय समिटमध्ये देशाची बदनामी
वाढत्या तंत्रज्ञानामुळे साहित्य डिजीटल माध्यमांनी घराघरात पोहचून ग्रामीण भागांतील वाचनसंस्कृती वाढत आहे. तंत्रज्ञानामुळे ग्रामीण वास्तवाची जाणीव लेखकांना अधिक प्रकर्षाने झाली तसेच ग्रामीण भागात साहित्यनिर्मितीची माहिती सहज उपलब्ध होत असून त्यातूनच नव्या ग्रामीण लेखकांची पिढी निर्माण झाली आहे.
– नितीन थोरात, लेखक प्रकाशक