
Din Vishesh
आज 19 फेब्रुवारी, आपल्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. आजवर आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक महान पुरुष होऊन गेले, पण शिवाजी महाराज म्हणजे सर्व महापुरुषांचे मेरूमणीच. जेव्हा महाराष्ट्र परकीय सत्तानी जखडलेला होता, तेव्हा शिवरायांनी स्वराजाची ज्योत मावळ खोऱ्यात पेटवली. वयाच्या १४ व्या वर्षी रायरेश्वरावर रक्ताचा अभिषेक करून त्यांनी आणि त्यांच्या सवंगड्यानी स्वराजाची शपथ घेतली होती. आजचा दिवस केवळ एक सण, उत्सव नाही, तर स्वाभिमान, शौर्य आणि स्वराज्याच्या विचारांची आठवण करुन देणारा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महारांनी त्यांच्या धैर्याने, दूरदुष्टी आणि न्यायप्रियतेने महाराष्ट्रालाच नव्हे संपूर्ण देशाला प्रेरणा दिली. त्यांच्या कार्यातून, पराक्रमातून आपल्याला शिस्त संघटन आणि लोकाभिमुख नेतृत्वाचे महत्व शिकायला मिळते. यामुळे आजच्या दिवशी केवळ घोषणा देऊन नाही, तर त्यांचे आदर्श अंगीकार करुन आपल्या परंपरेचा अभिमान बाळगण्याचा दिवस आहे.
19 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
19 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष
1818: ‘सरदार बापू गोखले’ – पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती यांचे निधन.
1915: ‘गोपाळ कृष्ण गोखले’ – थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 9 मे 1866)
1956: ‘केशव लक्ष्मण दफ्तरी’ – ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि विचारवंत यांचे निधन. (जन्म: 22 नोव्हेंबर 1880)
1978: ‘पंकज मलिक’ – गायक व संगीतकार यांचे निधन. (जन्म: 10 मे 1905)
1997: ‘राम कदम’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म: 28 ऑगस्ट 1918)
2003: ‘अनंत मराठे’ – पौराणिक हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते यांचे निधन.
2015: ‘नीरद महापात्रा’ – भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक यांचे निधन.( (जन्म: 12 नोव्हेंबर 1947)
2023: ‘मायिल सामी’ – भारतीय अभिनेते यांचे निधन.(जन्म: 2 ऑक्टोबर 1965)