
पॉवरप्लेमध्ये भारताची तोडफोड फलंदांजी (Photo Credit- X)
Abhishek Sharma is flyinggg! 🔥 pic.twitter.com/BWIgQvJ3Pt — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 8, 2026
भारताने सहा षटकांत एकही विकेट न गमावता ९२ धावा केल्या आहेत. सध्या अभिषेक शर्मा १९ चेंडूत ५१ आणि संजू सॅमसन १७ चेंडूत ३३ धावा करत फलंदाजी करत आहे. पहिल्या दोन षटकांत १२ धावा दिल्यानंतर, शेवटच्या चार षटकांत ८० धावा झाल्या आहेत. अभिषेकने अंतिम सामन्यासाठी आपले सर्वोत्तम प्रदर्शन वाचवले होते आणि संघाच्या विश्वासाला पात्र ठरला आहे. त्याच्या खराब फॉर्म असूनही, संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने वादळी अर्धशतक झळकावून तो विश्वास योग्य असल्याचे सिद्ध केले.
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड चौथ्यांदा आमनेसामने येत आहेत. एक रंजक आणि भारतासाठी काहीशी चिंतेची बाब म्हणजे, यापूर्वी झालेल्या तिन्ही विश्वचषक लढतींमध्ये न्यूझीलंडनेच बाजी मारली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात केवळ विजेतेपदच नव्हे, तर ‘किवी’ संघाविरुद्धचा हा खराब रेकॉर्ड पुसून काढण्याचे मोठे आव्हान सूर्या सेनेसमोर असेल. तसेच दोन्ही संघामध्ये एकूण ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. भारताने १८ सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने ११ सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आहे.
टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह.
न्यूझीलंड: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर (कर्णधार), जेकब डफी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन.