
‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन
भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १४ जुलै रोजी खेळला गेला. पण सामन्याच्या आदल्या दिवशी १३ जुलैच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीमध्ये, भारतीय संघ १२१ च्या रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर होता. तर दुसरीकडे, इंग्लंडचे रेटिंग ८९ होते, ज्यामुळे ते आठव्या स्थानावर होते. परंतु, जसजसे सामने झाले, तसतसे चित्र बदलले.
२० जुलै रोजीच्या क्रमवारीनुसार, भारतीय संघ आधीच पहिल्या क्रमांकावर आहे, परंतु त्याचे रेटिंग १२१ वरून ११६ पर्यंत घसरले आहे. इंग्लंडचे रेटिंग, जे ८९ होते, ते आता ९३ पर्यंत वाढले आहे आणि संघ आठव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. टीम इंडियाचा दोन सामन्यातील पराभवामुळे संघाला एकदिवसीय रँकिमध्ये झटका लागला आहे. तर, इंग्लंडला याचा चांगलाच फायदा झाला आहे.
भारताचे रेटिंग ११६ आहे, तर न्यूझीलंड १११ च्या रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. याचा अर्थ दोघांमध्ये फक्त पाच गुणांचा फरक आहे. मालिका गमावल्यामुळे हा अंतर कमी झाला आहे. भारतीय संघ आता सप्टेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे, तर न्यूझीलंडचा संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर भारतीय संघाला आपले अव्वल स्थान टिकवून ठेवणे कठीण होईल. अव्वल स्थान टिकवून ठेवण्यासाठी संघाला पुन्हा विजयाच्या मार्गावर परतावे लागेल. न्यूझीलंडने सामने जिंकल्यास टीम इंडिया पहिल्या स्थानावरुन खाली येईल.
लॉर्डस्वर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला २७ धावांनी पराभव पत्कारावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथन फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडने ३८७ धावा करत भारतासमोर ३८८ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात टीम इंडिया ३६० धावा करु शकली.
‘गोल मशीन’ एम्बाप्पे! ट्रॉफी हुकली, पण सलग दुसऱ्यांदा जिंकला FIFA वर्ल्ड कपचा गोल्डन बूट