
IND vs NZ T20 series: Will Rinku Singh face the wrath of 'Hanuman'? Controversy erupts due to 'that' post before the T20 series against New Zealand.
Rinku Singh’s troubles have increased : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका संपली असून या मालिकेत न्यूझीलंडने २-१ असा विजय मिळवला आहे. या दोन देशात २१ तारेखपासून पाच टी २० सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत रिंकू सिंग टीम इंडियाचा भाग आहे. या मालिकेपूर्वीच रिंकू सिंगच्या अडचणी वाढताना दिसत आहे. दीर्घकाळानंतर भारतीय संघात परतलेल्या रिंकू सिंग त्याच्या एका सोशल मीडिया रीलमुळे वादात सापडला आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या रीलमुळे त्याच्याविरुद्ध तक्रार देखील दाखल केली गेली आहे.
हेही वाचा : IND vs NZ : ‘त्याच्या क्षेत्ररक्षणात चुका…’, भारताच्या पराभवाने कर्णधार गिलवर अजिंक्य रहाणेची नाराजी
भारताचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंगकडून अलीकडेच सोशल मीडियावर एक रील शेअर करण्यात आला आहे. या रीलमध्ये तो त्याच्या क्रिकेट यशाचे श्रेय देवाला देताना दिसत असून व्हिडिओमध्ये भगवान हनुमान, भगवान विष्णू, भगवान शिव आणि भगवान गणेश कारमध्ये चष्मा घालताना दिसत आहेत. रिंकू सिंगने षटकार मारतानाचे दृश्ये देखील संपूर्ण रीलमध्ये छेडले गेले आहेत. हा संपूर्ण व्हिडिओ एआय तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आला होता. तथापि, हीच रील आता त्याच्यासाठी वादाचे कारण बनले आहे.
रिंकू सिंगने शेअर केलेल्या या रीलवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही चाहते रिंकू सिंगला पाठिंबा देखील देताना दिसत आहेत. याला श्रद्धा आणि श्रद्धेचा विषय म्हणत आहेत, तर काही आक्षेप घेण्यात येत आहेत. निषेध करणाऱ्यांचे मत आहे की, अशा प्रकारे देवतांचे चित्रण केल्याने धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. यासंदर्भात, करणी सेनेकडून अलीगडमधील सासनी गेट पोलिस स्टेशनमध्ये रिंकू सिंगविरुद्ध लेखी तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.
करणी सेनेचे म्हणणे आहे की रिंकू सिंगने शेअर केलेली रील आक्षेपार्ह असून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. एक जबाबदार खेळाडू म्हणून रिंकू सिंगने या प्रकरणाबद्दल जाहीरपणे माफी देखील मागावी असे संघटनेचे म्हणणे आहे. या तक्रारीनंतर, प्रकरण वाढले आहे.
क्रिकेटबद्दल सांगायचे झाले तर, रिंकू सिंगने अलीकडेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेश संघाचे नेतृत्व केले आहे. त्याने आपला संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवला होता. तथापि, सौराष्ट्र विरुद्धच्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेशचा १७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि संघ स्पर्धेतून बाहेर पडला. तथापि, न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी हा वाद मिटतो का? हे बघणे महतावचे ठरणार आहे.
हेही वाचा : T20 World Cup 2026 : ‘वानखेडे स्टेडियमवर खेळणे भावनिक….’, ‘या’ भारतीय वंशाच्या अमेरिकन गोलंदाजाचे विधान