
India to Host womens Champions Trophy 2027
आयसीसीने बुधवार, २ सप्टेंबर रोजी एक मोठी घोषणा केली आहे. महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या हंगामाचे यमजानपद भारताकडे सोपवण्यात आले आहे. १४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेतील सर्व सामने मुंबई आणि वडोदरा येथे खेळले जातील. या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांसह एकूण सहा संघ सहभागी होत आहेत. यजमानपदाचे हक्क आधी श्रीलंकेला देण्यात आले होते, परंतु श्रीलंका क्रिकेट बोर्डातील राजकीय हस्तक्षेपामुळे आयसीसीने श्रीलंकेकडून यजमानपदाचे हक्क काढून घेऊन ते भारताला दिले आहेत.
ICYMI the venues and dates of the inaugural ICC Women’s Champions Trophy have been confirmed 📝 Details 👇https://t.co/QrY2iyDwyU — ICC (@ICC) September 3, 2026
आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीच्या पहिल्या हंगामात पाकिस्तान संघ का सहभागी होणार नाही. कोणत्याही आयसीसी स्पर्धेत खेळणाऱ्या संघांची यादी क्रमवारीच्या आधारावर ठरवली जाते. आयसीसी टी२० क्रमवारीत केवळ अव्वल सहा संघच महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ साठी पात्र आहेत. यासाठीची अंतिम तारीख ६ जुलै, २०२६ होती. यजमान संघाव्यतिरिक्त, अव्वल पाच संघ प्रवेशासाठी पात्र होते. मात्र, अंतिम तारखेपर्यंत पाकिस्तान संघ अव्वल सहा संघांच्या बाहेर होता. स्पर्धेची घोषणा होऊनही, पाकिस्तान आयसीसी टी२० क्रमवारीत पहिल्या सहा संघांच्या बाहेरच आहे. त्यामुळेच पाकिस्तान या स्पर्धेत सहभागी होणार नाही. पाकिस्तानसोबतच बांग्लादेशलाही या स्पर्धेसाठी पात्र ठरला नाही.
महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. ही स्पर्धा पुढील वर्षी २०२७ मध्ये १४ फेब्रुवारी रोजी सुरू होईल आणि २८ फेब्रुवारीपर्यंत चालेल. या स्पर्धेचे सामने केवळ दोनच ठिकाणी खेळले जातील. यासाठी आयसीसीने मुंबई आणि बडोदा यांची निवड केली आहे. यामध्ये एकूण सहा संघ विजेतेपदासाठी स्पर्धा करतील. ही स्पर्धा राऊंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये आयोजित केली जाईल, ज्यामध्ये सर्व संघ एकमेकांविरुद्ध एकदा खेळतील. प्रत्येक संघ साखळी टप्प्यात तीन सामने खेळेल. अखेरीस, साखळी टप्प्यातील अव्वल दोन संघांमध्ये २८ फेब्रुवारी रोजी अंतिम सामना खेळला जाईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२५ मध्ये आपले पहिले एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद पटकावले होते. आता, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून इतिहास रचण्याचे संघाचे ध्येय असेल.