Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रयोग नडला, अब्रू गेली!! श्रेयस अन् गंभीरने घालवला Team India चा फॉर्म; BCCI ने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

भारतीय संघाचा आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात पराभव झाला आहे. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान भारतीय संघाची खराब कामगिरी पाहता बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही महत्वाची पावले उचलली आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 10, 2026 | 04:26 PM
प्रयोग नडला, अब्रू गेली!! श्रेयस अन् गंभीरने घालवला Team India चा फॉर्म; BCCI ने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाच्या पराभवावार बीसीसीआयने उचलले मोठे पाऊल
  • भारतीय संघाचा टी 20 सामन्यात 5 पराभव 
  • श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर उभे राहिले प्रश्नचिन्ह 
Indian Cricket Team/BCCI Updates: यंदाच्या वर्षी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने ती 20 वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर आयपीएलमधील खराब फॉर्ममुळे सूर्यकुमार यादवचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. श्रेयस अय्यरवर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र तो देखील अपयशी ठरत आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात भारताने मालिका गमावली आहे. यावर आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ अपयशी ठरला आहे. श्रेयस अय्यरकडे भारताचे टी 20 चे कर्णधारपद सोपवले होते. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले आहे. भारताने दोन्ही मालिका गमावल्या आहेत. यानंतर भारतीय संघाची कामगिरी आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यावर आता बीसीसीआयने मोठे पाऊल उचलले आहे.

‘Team India सारख्या शक्तिशाली…’; टी 20 सिरिज जिंकताच Harry Brook ने भारतीय संघाला डिवचले

भारतीय संघाचा आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात पराभव झाला आहे. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान भारतीय संघाची खराब कामगिरी पाहता बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही महत्वाची पावले उचलली आहेत. बीसीसीआय टीम इंडियावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सलग झालेले पराभव यामुळे बीसीसीआयने मोठे निर्णय घेतले आहेत. दारुण पराभवानंतर आता संपूर्ण भारतीय क्रिकेट संघ आणि संघ व्यवस्थापन रडारवर आल्याचे म्हटले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय केवळ खेळाडूच नव्हे तर कोचिंग स्टाफच्या कामगिरीचेही कडक मूल्यमापन करणार आहे. या पडझडीमुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या स्थानावरही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचे बीसीआयशी 2027 पर्यंत कॉंट्रॅक्ट आहे. मात्र आता अत्यंत सुमार आणि चिंताजनक कामगिरीमुळे गंभीरच्या रणनीतीवर एकूणच सर्व मॅनेजमेंटवर बीसीसीआयने आक्षेप घेतल्याचे समजते आहे. त्यामुळे जर मोठा निर्णय झाल्यास गौतम गंभीरचे मुख्य प्रशिक्षकपद जाणार का आणि श्रेयस अय्यरची कर्णधारपदावरून उचलबांगडी होणार का? हे पहावे लागणार आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असे घडले! टी20 मध्ये टीम इंडियाची मोठी नामुष्की; Shreyas Iyer च्या नावावर नकोसा विक्रम

टी 20 2026 चा वर्ल्डकप भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात जिंकला आहे. तरी देखील आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे त्याचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. श्रेयस अय्यरवर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र आता हा निनरया बीसीसीआयला महागात पडल्याचे दिसून येत आहे. श्रेयस अय्यरसाठी टी-२० कर्णधारपदाची सुरुवात एखाद्या दुःस्वप्नासारखी झाली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या पहिल्या ६ सामन्यांपैकी ५ सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. इतिहासात प्रथमच आयर्लंडने भारताला पराभूत केले आहे.

Web Title: Bcci checked all players and management performance team india lost ireland and england t20 sereis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • bcci
  • Gautam Gambhir
  • indian cricket team
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

‘Team India सारख्या शक्तिशाली…’; टी 20 सिरिज जिंकताच Harry Brook ने भारतीय संघाला डिवचले
1

‘Team India सारख्या शक्तिशाली…’; टी 20 सिरिज जिंकताच Harry Brook ने भारतीय संघाला डिवचले

‘हा अपमान सहन..; Team India चा दारुण परभव होताच भडकले शशी थरूर, ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
2

‘हा अपमान सहन..; Team India चा दारुण परभव होताच भडकले शशी थरूर, ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असे घडले! टी20 मध्ये टीम इंडियाची मोठी नामुष्की; Shreyas Iyer च्या नावावर नकोसा विक्रम
3

भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असे घडले! टी20 मध्ये टीम इंडियाची मोठी नामुष्की; Shreyas Iyer च्या नावावर नकोसा विक्रम

IND Vs ENG Live: वैभव-अभिषेक घालणार धुमाकूळ; भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
4

IND Vs ENG Live: वैभव-अभिषेक घालणार धुमाकूळ; भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.