
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ अपयशी ठरला आहे. श्रेयस अय्यरकडे भारताचे टी 20 चे कर्णधारपद सोपवले होते. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले आहे. भारताने दोन्ही मालिका गमावल्या आहेत. यानंतर भारतीय संघाची कामगिरी आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यावर आता बीसीसीआयने मोठे पाऊल उचलले आहे.
‘Team India सारख्या शक्तिशाली…’; टी 20 सिरिज जिंकताच Harry Brook ने भारतीय संघाला डिवचले
भारतीय संघाचा आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात पराभव झाला आहे. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान भारतीय संघाची खराब कामगिरी पाहता बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही महत्वाची पावले उचलली आहेत. बीसीसीआय टीम इंडियावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सलग झालेले पराभव यामुळे बीसीसीआयने मोठे निर्णय घेतले आहेत. दारुण पराभवानंतर आता संपूर्ण भारतीय क्रिकेट संघ आणि संघ व्यवस्थापन रडारवर आल्याचे म्हटले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय केवळ खेळाडूच नव्हे तर कोचिंग स्टाफच्या कामगिरीचेही कडक मूल्यमापन करणार आहे. या पडझडीमुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या स्थानावरही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचे बीसीआयशी 2027 पर्यंत कॉंट्रॅक्ट आहे. मात्र आता अत्यंत सुमार आणि चिंताजनक कामगिरीमुळे गंभीरच्या रणनीतीवर एकूणच सर्व मॅनेजमेंटवर बीसीसीआयने आक्षेप घेतल्याचे समजते आहे. त्यामुळे जर मोठा निर्णय झाल्यास गौतम गंभीरचे मुख्य प्रशिक्षकपद जाणार का आणि श्रेयस अय्यरची कर्णधारपदावरून उचलबांगडी होणार का? हे पहावे लागणार आहे.
टी 20 2026 चा वर्ल्डकप भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात जिंकला आहे. तरी देखील आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे त्याचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. श्रेयस अय्यरवर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र आता हा निनरया बीसीसीआयला महागात पडल्याचे दिसून येत आहे. श्रेयस अय्यरसाठी टी-२० कर्णधारपदाची सुरुवात एखाद्या दुःस्वप्नासारखी झाली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या पहिल्या ६ सामन्यांपैकी ५ सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. इतिहासात प्रथमच आयर्लंडने भारताला पराभूत केले आहे.