Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BCCI 10 Points Policy : काय आहे BCCI ची 10 पॉईंट पॉलिसी; लागू होणार सर्व खेळाडूंवर; वाचा नवीन नियमांची सूची

BCCI 10 Points Policy : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियासाठी काही नवीन नियम जारी केले आहेत. आतापासून भारतीय खेळाडूंना हे सर्व नियम पाळावे लागणार आहेत. या मध्ये दिरंगाई केल्यास मोठी कारवाईची शक्यता आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 17, 2025 | 02:45 PM
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

BCCI 10 Points Policy All Rules : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १० नवीन नियम जारी केले आहेत, जे सर्व भारतीय खेळाडूंना पाळणे बंधनकारक असणार आहेत. याचे उल्लंघन केल्याबद्दल खेळाडूंना कठोर शिक्षा देखील दिली जाऊ शकते. नियमांचे उल्लंघन केल्यास पगार कपात ते IPL बंदी अशा गोष्टींचा समावेश असेल. खरंतर हे सर्व संघात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी केले गेले आहे. चला तर मग जाणून घेऊया BCCI ने जारी केलेले सर्व १० नियम कोणते आहेत?

BCCI ने जारी केलेले नवीन नियम

#BCCI unveils a 10-point policy to promote discipline and unity in the team. pic.twitter.com/2OqbBSDIIa

— All India Radio News (@airnewsalerts) January 17, 2025

 

१. देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळणे अनिवार्य
भारतीय राष्ट्रीय संघाकडून खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचा BCCIच्या केंद्रीय करार यादीत समावेश आहे. त्या सर्वांना नियमितपणे देशांतर्गत क्रिकेटशी जोडले जावे लागेल. जर कोणताही खेळाडू तसे करू शकत नसेल तर त्याला मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांची परवानगी घ्यावी लागेल.

२. सर्व खेळाडू एकत्र प्रवास करतील
सर्व खेळाडूंना एकत्र प्रवास करणे बंधनकारक असेल, मग ते सामन्यासाठी प्रवास करीत असतील किंवा सराव सत्रासाठी. खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसोबत प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

३. खेळाडूंना फक्त निर्धारित वजनाप्रमाणे वस्तू सोबत घेता येणार
प्रवासादरम्यान खेळाडूंना जास्त सामान बाळगण्यास मनाई असेल. खेळाडू आता एका ट्रिपमध्ये १५० किलोपर्यंत सामान आणि सपोर्ट स्टाफ ८० किलोपर्यंत सामान वाहून नेऊ शकतात. जर कोणत्याही खेळाडूने या नियमाचे उल्लंघन केले तर त्याला स्वतः पैसे द्यावे लागतील.

४. वैयक्तिक कर्मचारीसोबत नेण्यास मनाई
BCCI च्या परवानगीशिवाय खेळाडू कोणत्याही दौऱ्यासाठी किंवा मालिकेसाठी वैयक्तिक कर्मचारी (व्यवस्थापक, स्वयंपाकी इ.) सोबत घेऊ शकत नाहीत.
५. बॅग्ज सेंटर ऑफ एक्सलन्सला पाठवणार
संघातील खेळाडूंना त्यांच्या सर्व वस्तू आणि वैयक्तिक वस्तू बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पाठवण्याबाबत संघ व्यवस्थापनाशी समन्वय साधावा लागेल. जर यापेक्षा जास्त रक्कम खर्च झाली तर खेळाडूला स्वतः पैसे द्यावे लागतील.

६. एकत्र सराव सत्रांना जावे लागणार
सर्व खेळाडूंना सराव सत्रांना उपस्थित राहावे लागेल आणि त्यांच्या निवासस्थानापासून मैदानापर्यंत एकत्र प्रवास करावा लागेल. संघात एकता आणण्यासाठी हे केले गेले आहे.

७. मालिकेच्या मध्यभागी जाहिराती शूट करण्याचे स्वातंत्र्य नाही
जर कोणतीही मालिका सुरू असेल किंवा संघ कोणत्याही परदेश दौऱ्यावर असेल. अशा परिस्थितीत, खेळाडूंना वैयक्तिक जाहिरात शूट करण्याचे किंवा प्रायोजकांसोबत काम करण्याचे स्वातंत्र्य राहणार नाही.

८. नवीन कुटुंब धोरण
जर भारतीय संघ ४५ दिवस किंवा त्याहून अधिक काळाच्या परदेश दौऱ्यावर असेल. अशा परिस्थितीत, खेळाडूचे कुटुंब त्याच्यासोबत फक्त २ आठवडे राहू शकते. या दौऱ्यातील खर्च BCCI उचलेल, उर्वरित खर्च खेळाडूंना स्वतः करावा लागेल.

९. BCCIने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये उपलब्धता
खेळाडूंना BCCI ने आयोजित केलेल्या शूटिंग आणि इतर सर्व कार्यक्रमांसाठी उपलब्ध राहावे लागेल. यामुळे खेळाडूंमध्ये त्यांच्या संघाप्रती एकता टिकून राहण्यास तसेच क्रिकेट खेळाला चालना देण्यास मदत होईल.

१०. मालिकेच्या शेवटपर्यंत खेळाडूंनी एकत्र राहावे
सामना किंवा मालिका संपेपर्यंत सर्व खेळाडूंनी एकत्र राहावे. जरी सामना नियोजित वेळेपूर्वी संपला तरी.

Web Title: Bcci creat new policy for indian cricket team these are all the rules of bccis 10 points policy read all details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 02:44 PM

Topics:  

  • bcci
  • cricket
  • Gautam Gambhir
  • india
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

जो रूटने शतक ठोकून केला कहर! आता सचिनचा 100 शतकांचा विक्रम मोडण्यापासून फक्त इतक्या पावलांवर…
1

जो रूटने शतक ठोकून केला कहर! आता सचिनचा 100 शतकांचा विक्रम मोडण्यापासून फक्त इतक्या पावलांवर…

NIA Raids: दहशतवादी कट रचल्याप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये २२ ठिकाणी छापे
2

NIA Raids: दहशतवादी कट रचल्याप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये २२ ठिकाणी छापे

Trump Tariff : ‘ट्रम्प यांनी योग्य केले’  भारतावर अमेरिकेच्या टॅरिफ लादण्याबाबत झेलेन्स्की यांचे मोठे विधान
3

Trump Tariff : ‘ट्रम्प यांनी योग्य केले’ भारतावर अमेरिकेच्या टॅरिफ लादण्याबाबत झेलेन्स्की यांचे मोठे विधान

Happy Birthday Shubman Gill : भारतीय कसोटी कर्णधाराची मालमत्ता किती? जाणून घ्या पगार आणि कार कलेक्शन
4

Happy Birthday Shubman Gill : भारतीय कसोटी कर्णधाराची मालमत्ता किती? जाणून घ्या पगार आणि कार कलेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.