
एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्सवर कारवाई
स्लो ओव्हर रेटमुळे बसला भुर्दंड
श्रेयस अय्यरवर सलग दोन वेळेस कारवाईचा बडगा
BCCI On Pat Cummins: काल अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमध्ये (IPL 2026) सामना पार पडला. यामध्ये गुजरातच्या संघाने एसआरएचचा 86 रन्सने पराभव केला आहे. एसआरएचचा पराभव झाला आणि त्यासोबत आणखी एक अडचण त्यांच्या वाटेला आली आहे. बीसीसीआयने एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्सवर कारवाई केली आहे.
गुजरातने एसआरएचचा दारुण पराभव केला आहे. मात्र त्यासोबतच कर्णधार पॅट कमिन्सच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्लो ओव्हर रेटमुळे पॅट कमिन्सवर कारवाई करण्यात आली आहे. बीसीसीआयने कमिन्सवर 12 लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. आयपीएलने अधिकृत पत्रक प्रसिद्ध करत या दंडाची घोषणा केली आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार Article 2.22 नुसार कारवाई केली गेली.
सनरायझर्स हैदराबादचा या हंगामातील स्लो ओवर रेटचा ही पहिलीच चूक आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा अशी चूक झाल्यास त्यांच्यावर दुप्पट दंड लगावला जाऊ शकतो. किंवा सारखी अशी चूक झाल्यास पॅट कमिन्सवर काही सामने खेळण्यासाठी बंदी घातली जाऊ शकते. आयपीएल 2026 मध्ये असा भुर्दंड सोसणारा कमिन्स हा एकमेव कर्णधार नाही.
स्वतः बुडलेच पण ‘या’ संघांनाही बुडवणार? Mumbai Indians प्ले ऑफमध्ये कोणाचा खेळ संपवणार? पहा समीकरण
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर स्लो ओव्हर रेटमुळे दोन वेळेस कारवाईला सामोरे जावे लागले आहे. पहिल्या चुकीसाठी 12 लाख आणि दुसऱ्या चुकीसाठी त्याला थेट 24 लाख रुपयांचा बंपर दंड भरावा लागला आहे. मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीसोबतच हार्दिकला संथ ओव्हर रेटमुळे 12 लाख रुपयांचा दंड सहन करावा लागला आहे. शुभमन गिल, अजिंक्य रहाणे आणि अक्षर पटेलला देखील कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
Mumbai Indians प्ले ऑफमध्ये कोणाचा खेळ संपवणार?
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील ही ‘पलटण’ स्वतः बाहेर झाली असली, तरी उर्वरित सामन्यांमध्ये ती इतर बलाढ्य संघांचे गणित पूर्णपणे बिघडू शकते. मुंबई इंडियन्सचे अद्याप तीन सामने बाकी आहेत. त्यामुळे मुंबई पलटण प्ले ऑफ च्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या संघांचे गणित बिघडवू शकते. आता गेम नक्की कोणाचा होणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंजाबला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे. उद्या धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. अशा स्थितीत, मुंबईने जर पंजाबला धूळ चारली, तर पंजाबचे प्लेऑफचे स्वप्न तिथेच भंग पावेल. मुंबई या सामन्यात पंजाबचा रस्ता रोखण्यासाठी पूर्ण ताकदीने खेळेल यात शंका नाही.