Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS BAN : भारत जाणार बांगलादेश दौऱ्यावर, एकदिवसीयसोबतच रंगणार टी-२० सामने.. 

भारत ऑगस्टमध्ये बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारत मिरपूरमधील शेर-ए-बांगला स्टेडियमवर चार आणि चितगावमध्ये दोन सामने खेळणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 16, 2025 | 08:11 AM
IND VS BAN: India will tour Bangladesh, T20 matches will be played along with ODIs.

IND VS BAN: India will tour Bangladesh, T20 matches will be played along with ODIs.

Follow Us
Close
Follow Us:

IND VS BAN : ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारत मिरपूरमधील शेर-ए-बांगला स्टेडियमवर चार आणि चितगावमध्ये दोन सामने खेळेल. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) मंगळवारी ही घोषणा केली. बांगलादेश दौऱ्यात भारत तीन एकदिवसीय आणि तितकेच टी-२० सामने खेळेल. ही भारताची बांगलादेशमधील पहिलीच टी-२० द्विपक्षीय मालिका असेल आणि २०१४ नंतरचा त्यांचा पहिला मर्यादित षटकांचा दौरा असेल.

हेही वाचा  : LSG vs CSK : ‘कर्णधाराच्या मनात खास…’, फिरकीपटू रवी बिश्नोईकडून ऋषभ पंतचा बचाव, सीएसकेविरुद्धच्या सामन्याबाबत मोठा खुलासा

पहिले दोन एकदिवसीय सामने आणि शेवटचे दोन टी-२० सामने मीरपूरमध्ये खेळले जातील तर तिसरा एकदिवसीय सामना आणि पहिला टी-२० सामना चितगावमध्ये खेळला जाईल. भारताला १३ ऑगस्ट रोजी ढाका पोहोचायचे आहे. पहिले दोन एकदिवसीय सामने १७ आणि २० ऑगस्ट रोजी खेळले जातील, त्यानंतर संघ २३ ऑगस्ट रोजी तिसरा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी चितगावला जातील.

पहिला टी-२० सामना २६ ऑगस्ट रोजी चितगाव येथे होईल. शेवटचे दोन टी-२० सामने २९ आणि ३१ ऑगस्ट रोजी मीरपूर येथे खेळवले जातील. या दौऱ्यामुळे आशिया कप टी-२० च्या तयारीलाही मदत होईल. भारत या स्पर्धेचे यजमान आहे परंतु दोन्ही देशांमधील करारानुसार पाकिस्तान भारतात येणार नसल्याने ही स्पर्धा पूर्णपणे श्रीलंका, बांगलादेश किंवा युएईमध्ये होईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा  : RR vs DC : घरच्या मैदानावर विजय नोंदविण्यासाठी डीसी सज्ज, अक्षर पटेलसमोर संजू सॅमसनच्या राजस्थानचे आव्हान

श्रेयस अय्यर मार्च महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू..

आयसीसीकडून भारताचा स्टार फलंदाज आणि सध्या आयपीएल २०२५ मधील  पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला मार्च महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडून मोठा सन्मान देण्यात आला आहे.   त्याने न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र आणि जेकब डफी यांना हरवून हा किताब जिंकला आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तान आणि दुबई येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरच्या प्रभावी कामगिरीचे बक्षीस अय्यरला मिळाले आहे. अय्यरने स्पर्धेत २४३ धावा केल्या आणि तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. या कामगिरीच्या आधारे, अय्यरने विशेष यादीत स्थान मिळवले आहे.

श्रेयस अय्यरची प्रतिक्रिया..

‘महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू’ हा किताब मिळल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला की, मार्च महिन्यासाठी ‘महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू’ म्हणून निवड झाल्याबद्दल मी आनंदी  आहे. हा सन्मान खरोखरच खूप खास आहे. मी नेहमीच हा क्षण जपून ठेवणार आहे.  मोठ्या मंचावर भारताच्या यशामध्ये  योगदान देणे हे प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूचे स्वप्न असते. माझ्या सहकाऱ्यांच्या, प्रशिक्षकांच्या आणि सपोर्ट स्टाफच्या अढळ पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल मी आभारी आहे.

Web Title: Ind vs ban india will tour bangladesh t20 matches will be played along with odis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 08:11 AM

Topics:  

  • IND VS BAN
  • one day cricket
  • Rohit Sharma
  • T20 series

संबंधित बातम्या

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
1

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
2

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
3

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल
4

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.