भारत आणि श्रीलंका यांच्यातील बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेला १५ ऑगस्ट म्हणजेच उद्यापासून सुरुवात होणार आहे. दोन्हीही संघ या महामुकाबल्यासाठी सज्ज आहे. याआधी दोन्ही संघाने तीन दिवसीय सराव सामना खेळला. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ६ विकेट्सने पराभव केला. आता खऱ्या कसोटीची सुरुवात होणार आहे. कधी आणि किती वाजता सुरु होणार हे सामने, जाणून घेऊयात.
भारतीय क्रिकेट संघ सर्वप्रथम कोलंबो येथे दाखल झाला, जिथे तीन दिवसांचा सराव सामना खेळवण्यात आला. भारतीय संघाने चांगली कामगिरी करत एक मोठा विजय नोंदवला. त्यानंतर संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी गॉलमध्ये दाखल झाला आहे. जिथे पहिला कसोटी सामना रंगणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल, कारण तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (WTC) एक भाग आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्या वेळापत्रकात फारसा फरक नाही. त्यामुळे, सामना भारताबाहेर खेळला गेला तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही. पहिला सामना गॉलमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०:०० वाजता सुरू होईल, ज्यासाठी अर्धा तास आधी सकाळी ९:३० वाजता नाणेफेक होईल. कसोटी सामन्यांमध्ये दिवसाला ९० षटके टाकली जातात. असे झाल्यास, सामना सायंकाळी ५:०० ते ५:३० वाजेपर्यंत चालू राहू शकतो.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत, भारतीय संघ सध्या ४८.१५ टक्के पीसीटीसह पाचव्या स्थानावर आहे, तर श्रीलंकेचा पीसीटी ४१.६७ टक्के असून ते सहाव्या स्थानावर आहेत. त्यामुळे, सामन्याचा निकालाचा गुणतालिकेवर आणि पीसीटीवर महत्त्वपूर्ण परिणाम होईल. सामन्याच्या पाच दिवसांत खेळाडू कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
श्रीलंकेचा संघ: धनंजया डी सिल्वा (कर्णधार), लाहिरू उदारा, निशान मदुष्का, कामिंदू मेंडिस (उप-कर्णधार), दिनेश चांदिमल, पसिंदू सूरियाबंदरा, सोनल दिनुशा, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, केशर नुवांथा, मिलन रथनायके, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, विश्व फर्नांडो, दिलशान मदुश्का
भारताचा संघ : शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी, सरफराज खान
IND vs SL: गॉल कसोटीत टीम इंडियाचा ‘स्पिन’ मास्टरप्लॅन! 3 डावखुरे फिरकीपटू मैदानात उतरणार?



