IND vs WI 1st Test: Silence in the stadium without Virat and Rohit! No spectators in Ahmedabad Test; Video goes viral
India vs West Indies first Test match : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादमध्ये २ ऑक्टोबरपासून खेळला जात आहे. हा सामना २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली दिसत आहे, कारण प्रेक्षकांची संख्या नगण्य दिसून आली आहे. १,००,००० पेक्षा जास्त प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या भव्य स्टेडियममध्ये प्रेक्षकांची उपस्थिती अत्यंत कमी होती.
तथापि, काही लोकांचे असे म्हणणे आहे की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर कसोटी क्रिकेटची क्रेझ संपली असून म्हणून प्रेक्षकांनी कसोटीकडे पाठ फिरवली आहे. या रिकाम्या स्टेडियमचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
हेही वाचा : ILT20 मध्ये कुणी भाव दिला नाही! आता अश्विनने घेतला मोठा निर्णय; BBLमध्ये सिडनी थंडरसाठी खेळणार संपूर्ण हंगाम
एका वापरकर्त्याकडून सोशल मीडियावर रिकाम्या स्टेडियमचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आणि त्यावर लिहिले की हा रणजी ट्रॉफी सामना नाही. हा रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय भारतात खेळला जाणारा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना आहे. तथापि, काही वापरकर्त्यांचे असे देखील म्हणणे आहे की उत्सवामुळे प्रेक्षक सामन्याला हजर राहिले नाहीत.
This is not a Ranji match, this is an international match happening in India without Rohit Sharma and Virat Kohli.🙏 #INDvWI pic.twitter.com/q7f9sRNiuc — 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) October 2, 2025
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना हा अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. अहमदाबादमध्ये नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. त्यामुळे सर्वजण उत्सवात व्यस्त असतात. या सामन्याच्या निराशाजनक कामगिरीचे आणखी एक कारण म्हणजे हा सामना वेस्ट इंडिजसारख्या संघाविरुद्ध खेळवण्यात येत आहे. वेस्ट इंडिजचा संघ ८ व्या क्रमांकावर आहे आणि तो भारतासमोर टिकू शकणार नाही.
अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी खेळवण्यात येत आहे. या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा डाव १६२ धावांवर आटोपला. भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि जसप्रीत बूमराह यांनी टिच्चून गोलंदाजी केली. पहिल्या दिवसाअखेर भारतीय संघाने पहिल्या डावात २ बाद १२१ धावा केल्या होत्या.
भारतीय संघाचा माजी दिग्गज अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला आंतरराष्ट्रीय लीग T20 मध्ये कोणताही खरेदीदार मिळू शकला नाही. लिलावादरम्यान, सहा संघांच्या फ्रँचायझींपैकी कोणीही त्याच्यावर बोली लावली नाही. ILT20 मध्ये विक्री न झाल्यानंतर, अश्विनने आता मोठा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय लीग T20 मध्ये कुणी खरेदीदार न मिळाल्यावर अश्विनने बिग बॅश लीगचा संपूर्ण हंगाम खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आर. अश्विनने सिडनी थंडरसाठी संपूर्ण बीबीएल हंगाम खेळण्यास सहमती दर्शविली आहे.