
कधी होणार भारत-इंग्लंडमधला दुसरा टी 20 सामना?
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला टी 20 सामना पावसामुळे रद्द झाला आहे. आता दुसरा सामना 4 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. शनिवारी दुसरा टी 20 सामना खेळवला जाणार आहे. दूसरा सामना सुरू होण्यासाठी केवळ दोन दिवसांचा वेळ दोन्ही संघांना मिळणार आहे. आता भारताला सिरिज जिंकायची असेल तर भारताला 4 पैकी 3 सामने जिंकावे लागणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यात वैभव सूर्यवंशीला स्थान दिले जाणार का हे पहावे लागणार आहे.
लाज काढली! ‘गंभीर अहंकारी तर श्रेयसला तो अजिबात…’; Vaibhav Sooryvanshi वरून गंभीर-अय्यर प्रचंड ट्रोल
Vaibhav Sooryvanshi वरून गंभीर-अय्यर प्रचंड ट्रोल
15 वर्षीय वैभव सूर्यवंशी भारतीय संघाकडून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कधी पदार्पण करणार याची उत्सुकता वाढली आहे. भारतीय क्रिकेट आणि कर्णधार श्रेयस अय्यर त्याला संधी देणार की नाही अशी चर्चा देखील सुरू झाली आहे. भारतीय मॅनेजमेंट आयर्लंडविरुद्ध अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनवर विश्वास ठेवा. मात्र संजू सॅमसन सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे वैभवला संधी दिली जात नसल्याने चाहते चांगलेच संतापले आहेत.
आयर्लंड दौऱ्यात देखील संजू सॅमसन अन् अभिषेक शर्माने भारताची सुरुवात केली. मात्र आयर्लंडविरुद्ध संजू सॅमसन चांगली खेळी करू शकला नाही. तर इंग्लंडविरुद्ध तो केवळ 1 रन करू शकला. तरी देखील वैभव सूर्यवंशीला स्थान दिले जात नसल्याने चाहत्यांनी सोशल मिडियावर कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला चांगले धारेवर धरले आहे.
संजू सॅमसन अपयशी
आयर्लंडविरुद्ध संजू सॅमसन पहिल्या सामन्यात 1 , दुसऱ्या सामन्यात 5 रन्स करू शकला. तर इंग्लंडविरुद्ध देखील तो शून्यावर आउट झाला. तीन टी 20 सामन्यांमध्ये त्याने केवळ 5 रन्स केल्या आहेत. टी 20 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल त्याच्यावर विश्वास दर्शवण्यात आला होता. मात्र या सिरिजमध्ये तो अपयशी ठरला आहे. त्याच्या फ्लॉप शो वरून गौतम गंभीर अन् श्रेयस अय्यरवर टीका केली जात आहे.