
photo- social media
IND vs AFG ODI: आईचा फोन आला अन् पत्रकार परिषद थांबली; नीतीश रेड्डीचा भावनिक क्षण, Video व्हायरल
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी नेहमीच उत्साह आणि भावनेने भरलेला असतो. महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये एजबॅस्टन मैदानावर झालेल्या या महामुकाबल्यात फक्त मैदानावरील रोमांचच नाही तर प्रेक्षकसंख्येनेही नवीन विक्रम नोंदवला आहे. एडजबॅस्टन स्टेडियमवर झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याला १८,८१४ प्रेक्षकांनी हजेरी लावली होती, जी महिला टी-२० विश्वचषक इतिहासातील कोणत्याही ग्रुप टप्प्यातील आतापर्यंतची सर्वाधिक उपस्थिती ठरली. यापूर्वी, २०२४ च्या टी२० विश्वचषकादरम्यान दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याला १५,९३५ प्रेक्षक उपस्थित होते.
Statement win from India as they defeat arch-rivals Pakistan to kick off their #T20WorldCup campaign 👊 📝: https://t.co/GWzpFgR2ei pic.twitter.com/NMajze9vtO — ICC (@ICC) June 14, 2026
भारताने या हायव्होटेज सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताने धडाकेबाज सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ६ बाद १७० धावा उभारल्या. सलामीवीर स्मृती मंधानाने ४४ चेंडूंमध्ये ६८ धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. या अर्धशतकासह ती महिला टी-२० विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये संयुक्तपणे अव्वल स्थानी पोहोचली. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३६ धावांचे योगदान दिले, तर रिचा घोषने अवघ्या १७ चेंडूंमध्ये ३४ धावांची स्फोटक खेळी करून संघाला मोठी धावसंख्या मिळवून दिली. महिला टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
पाकिस्तानच्या डावात मुनीबा अलीने ४१ धावांची झुंज दिली. मात्र दीप्ती शर्माच्या फिरकीसमोर पाकिस्तानी फलंदाज टिकू शकले नाहीत. तिच्या भेदक गोलंदाजीमुळे पाकिस्तानचा डाव १०६ धावांवर संपुष्टात आला. दीप्ती शर्माने तिच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेत पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. भारताने हा सामना ६४ धावांनी जिंकला. भारत आपला पुढील सामना १७ जून रोजी हेडिंग्ले येथे नेदरलँड्सविरुद्ध खेळेल. पाकिस्तानचा सामना एडजबॅस्टन येथे दक्षिण आफ्रिकेशी होईल.
क्रीजवर गोंधळानंतर Rohit Sharma रनआउट; हिटमॅन भडकला? मैदानात नेमकं काय घडलं, गिलचा खुलासा