
सराव सामन्यात भारतीय महिला संघाचा वेस्ट इंडिजवर विजय
12 जून पासून सुरू होणार आयसीसी महिला विश्वचषक 2026
स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारतीय संघाचा शानदार विजय
ICC Women’s World Cup 2026: 12 जूनपासून आयसीसी महिला विश्वचषक 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. 14 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. त्यापूर्वी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघाचा सराव सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाचा विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिज संघाचा 26 रन्सने पराभव झाला आहे. दरम्यान आजच्या सामन्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारताची फलंदाजी
वेस्ट इंडिजच्या महिला संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ फलंदाजी करण्यासाठी प्रथम मैदानात उतरला. स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने भारताची सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र स्मृती मंधाना 39 रन्स करून आउट झाली. तर शेफाली वर्मा 29 रन्स करून आउट झाली.
A winning start to our #T20WorldCup preparations 👏#TeamIndia with a strong all-round outing to register a 2⃣6⃣-run victory against West Indies in the warm-up match 👌#WomenInBlue pic.twitter.com/uiPfFjTdHK — BCCI Women (@BCCIWomen) June 8, 2026
त्या पाठोपाठ जेमिमाह रॉड्रिग्जने केवळ 7 रन्स केल्या. यास्तिका भाटियाने देखील 26 बॉलमध्ये 36 रन्सची कहली केली. भारतीय महिला संघाकडून भारती फूलमाळीने अर्धशतकी खेळी केली. भारती 56 रन्सची शानदार खेळी केली. ऋचा घोष शून्यावर आउट झाली. राधा यादव, श्रेयांका पाटील आणि क्रांति गौड व श्री चरणीला फलंदाजीमध्ये चांगली खेळी करता आली नाही.
वेस्ट इंडिजची गोलंदाजी
वेस्ट इंडिजच्या महिला संघाने सराव सामन्यात चांगली गोलंदाजी केली. अनेक फलंदाजांना दुहेरी आकडा गाठण्यापासून रोखण्यात यश मिळवले. वेस्ट इंडिजकडून अफी फ्लेचरने भारताच्या 4 महत्वाच्या विकेट्स पटकावल्या. तर डिआंड्रा डॉटिन आणि करिश्मा रामहरक व आलिया ॲलेनने प्रत्येकी 1 1 विकेट घेतल्या.
लक्ष फक्त Women’s T20 World Cup कडे: भारतीय महिला संघ इंग्लंडला रवाना; 14 जूनला महामुकाबला
भारताची गोलंदाजी
भारतीय महिला क्रिकेट संघाचा आजचा सामना सराव सामना असला तरी महत्वाचा समजला जात होता. या सामन्यात भारताकडून श्रेयांका पाटील आणि राधा यादव यांनी शानदार आणि भेदक गोलंदाजी केली. श्रेयांका पाटीलने वेस्ट इंडिजच्या संघाचे 4 महत्वाच्या विकेट्स घेतल्या. राधा यादवने 3 विकेट्स पटकावल्या.
Harmanpreet Kaur: ‘मी रिटायर व्हावं असं…’; हरमनप्रीत कौरची पत्रकाराला गुगली, Video Viral
हरमनप्रीत कौरने केले मोठे विधान
भारतीय महिला संघाने 2025 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढवला आहे. आता आगामी आयसीसी टी२० विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य भारतीय संघाने ठेवले आहे. 2025 मधील विजय केवळ ट्रॉफीपुरता मर्यादित नसून महिला क्रिकेटची एक नवी सुरुवात असल्याचे कर्णधार हरमनप्रीत कौरने म्हटले आहे.