भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडला रवाना (फोटो- ट्विटर)
वूमन्स टी-20 वर्ल्डकप 12 जूनपासून सुरू होणार
वर्ल्डकप आधी भारत विरुद्ध इंग्लंड मालिका खेळवली जाणार
14 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान भिडणार
Women’s T20 World Cup 2026: आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे. 12 जूनपासून वर्ल्ड कप सुरू होणार आहे. यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ सज्ज झाला आहे. एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यावर भारतीय महिला संघाचा आत्माविश्वास वाढला आहे. मात्र या स्पर्धेआधी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. आधी इंग्लंडविरुद्ध देखील भारताचा संघ खेळणार आहे.
टी- 20 विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याआधी भारतीय महिला क्रिकेट संघ यजमान इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची टी- 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेमुळे भारतीय संघाला इंग्लंडमधील हवामानाशी आणि खेळपट्टीशी जुळवून घेण्यास मदत होणार आहे.
पहिला टी-२० सामना: २८ मे २०२६ – चेल्म्सफोर्ड
दुसरा टी-२० सामना: ३० मे २०२६ – ब्रिस्टल
तिसरा टी-२० सामना: २ जून २०२६ – टॉन्टन
ICC Women’s T20 World Cup 2026: “… ही तर केवळ सुरुवात”; हरमनप्रीत कौरने केले मोठे विधान
The beginning of yet another special journey! 🔥🧿 Cheered by fans and well-wishers, #TeamIndia depart from Mumbai for the ICC Women's #T20WorldCup! 👏 ICC Women's #T20WorldCup 👉 Starts 12th June pic.twitter.com/by0PqjMnmg — Star Sports (@StarSportsIndia) May 23, 2026
भारतीय महिला क्रिकेट संघाला आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्पॉट केले गेले. आज महिला क्रिकेट संघ मुंबईतून इंग्लंडला प्रयाण केले. यावेळी चाहत्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा 12 जून ते 5 जुलै या कालावधीत होणार आहे. भारतीय संघ अ गटात असणार आहे. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेदरलँड्स हे संघ असणार आहेत.
हरमनप्रीत कौरने केले मोठे विधान
भारतीय महिला संघाने 2025 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढवला आहे. आता आगामी आयसीसी टी२० विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य भारतीय संघाने ठेवले आहे. 2025 मधील विजय केवळ ट्रॉफीपुरता मर्यादित नसून महिला क्रिकेटची एक नवी सुरुवात असल्याचे कर्णधार हरमनप्रीत कौरने म्हटले आहे.
काय म्हणाली हरमनप्रीत कौर?
2025 च्या वर्ल्डकप जिंकणे हा भारतीय महिला क्रिकेटसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि भावनिक क्षण होता. ही तर केवळ सुरुवात आहे. या विजयामुळे आमच्या संघाचा आत्मविश्वास देखील वाढला आहे. आम्ही आता विजयाची सवय लावून घेतली आहे. हा विजय केवळ एक ध्येय नव्हते. तर भारतीय महिला क्रिकेटच्या एका नव्या युगाची सुरुवात आहे. महिला क्रिकेटच्या सर्वात मोठ्या टप्प्याचे उलटी गिनती सुरू झाली आहे. आयसीसीने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तारखेसह महिला टी-२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. पुन्हा एकदा, दोन कट्टर प्रतिस्पर्धी आयसीसी स्पर्धेत आमनेसामने येणार आहोत.






